(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगांव –रविवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाच्या सरी, विजांचा कडकडाट मोठया प्रमाणांत कोसळल्या त्यामुळे शहरात सखल भागात , प्रभागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणांत पाणी साठले आहे. गोदावरी डावा आणि उजव्या कालवा लाभक्षेत्रात रविवारी २१९ मिलीमिटर म्हणजेच ८.७६ इंच पाउस पडल्याची नोंद आहे. कोपरगांव शहरासह ब्राम्हणगांव तर शिर्डीत चांगला पाउस झाला आहे. दारणा, गंगापुर, मुकणे वालदेवी धरणांतुन उन्हाळी आर्वतनासाठी २७ हजार ७०५ क्युसेक्स पाणी गोदावरी कालव्यांना तर गोदावरी नदीला ११ हजार २९७ क्युसेक्स पाणी सोडण्यांत आले आहे. यंदा मान्सुनचे लवकर आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने सुतोवाच केले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांचे बाहेर पडलेल्या कांदा पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, तर जनावरांना पावसाचा तडाखा सहन करावा लागला. ग्रामिण भागात वीज गायब आहे. रविवार २५ मे रोजी पडलेला पाउस मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे.
दारणा (१२), मुकणे (२), वाकी (२), भाम (९), भावली (११), भोजापुर (२५), पालखेड (२), करंजवण (६), ओझरखेड (१३), नाशिक (६), देवगांव (१५), ब्राम्हणगांव (३५), कोपरगांव (२७), सोमठाणा (१९), कोळगांव (२८), सोनेवाडी (२४), शिर्डी (३४), राहाता (२६), रांजणगांव खुर्द (११), याप्रमाणे पाउस झाला. बेमोसमी पावसामुळे शेतक-यांचे उघडयावरील धान्य झाक-पाक करण्यांत धांदल उडाली. अनेक ठिकाणी जुनाट झालेले विजेचे पोल तारा मोडुन पडल्या. तात्पुरते पत्रे शेड वा-यामुळे उडुन गेले. मुकी जनावरे चरण्यासाठी दुरवर गेली त्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. उन्हाळी कांदा पिकाचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले. यापुर्वी १९ मे रोजी असाच अवकाळी पाऊस बरसला. गोदावरी डावा आणि उजवा कालवा लाभक्षेत्रात ३ इंच तर नाशिक परिसरातील धरणांवर ७ इंच पाउस पडल्याची नोंद आहे. गेल्या ४० वर्षात प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणांत ऐन उन्हाळयात अवकाळी पाउस झाल्याचे वयोवृद्ध्द ज्येष्ठ जाणकारांचे म्हणणे आहे.
मान्सुन यंदा लवकर येणार असल्याचे सुतोवाच झाल्यांने बाजारात बी बीयाणे किटकनाशकांची दुकाने सजली आहे. सोयाबीन, मका वाणाचे बी बीयाणे रेलचेल आहेत. ब्राम्हणगांव परिसरात चांगला पाउस झाल्याने १२-१५ दिवस मशागतीसाठी शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे.दारणेतुन १७ हजार ७०१, गंगापुर ११ हजार ४३५, मुकणे ६ हजार ५०५ व वालदेवी धरणातुन ३ हजार ३६१ क्युसेक्स पाणी गोदावरी कालव्यासह नदीस सोडण्यांत आले आहे. धरण कार्यक्षेत्रात मात्र अजुन मान्सुन सुरू झालेला नाही त्यामुळे धरणे खपाटीला आहेत.
