स्नेहमेळावा

“२० वर्षांनी पुन्हा जागल्या आठवणी; चितळी न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘रियुनियन डे’ ठरला भावनिक आणि संस्मरणीय”

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – चितळी (ता. राहाता) येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता दहावी २००३-२००४ बॅचचा स्नेहमेळावा (दि.३) मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात नुकताच पार पडला.तब्बल वीस वर्षांनंतर शाळेतील वर्गमित्र पुन्हा एकत्र आले आणि आपले बालपणीचे क्षण पुन्हा अनुभवले. स्नेह मेळाव्या दरम्यान सर्वाधिक असे ११० माजी विद्यार्थी प्रथमच एकत्र जमले.

सकाळी १० वाजता शाळेसमोर सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले. शाळेच्या गेटमधून शाळेच्या प्रांगणात प्रवेश करताच सर्वांचे ऊर दाटून आले जुन्या वर्गखोल्या, शाळेची वाजणारी बेल,अंन.. समोरील वडाचे झाड आणि शाळेतील व्यासपीठ पाहून सर्वजण भावूक झाले. त्यानंतर सर्वांनी आपल्या वर्गात प्रवेश केला.अनेकांनी त्या आठवणींना सजीव करत फोटो काढले, यासह इयत्ता दहावीच्या वर्गातील बेंचवर बसण्याची मजा लुटली हसले, बोलले, पण शाळेच्या परिसरातून निघताना मात्र सर्वांचे पाय थांबले.

 

पुढील कार्यक्रमाचे नियोजन ठरलेलेच होते, नियोजनाप्रमाणे शाळेला भेट दिल्यानंतर सर्वजण दुपारी १२ वाजता सप्तपदी लॉन्स येथे पोहोचले. यावेळी कार्यक्रमाच्या सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी चव्हाण मॅडम होत्या.यावेळी शिरसाठ सर वमणे सर, बोरुडे सर,देसाई सर, चांदे सर, गोरखे सर, चव्हाण मॅडम, शिंदे मॅडम,पठाण मॅडम, शेळके मॅडम, पाटील मॅडम,चांदे मॅडम गोरखे मॅडम आणि शिपाई त्रिभुवन मामा, गायकवाड मामा, टोरपे मामा उपस्थित होते.सर्व माजी शिक्षकवृंद आणि सेवकांचा फेटे बांधून शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत झालेले शिक्षक कोळपकर सर धामणे सर, कडभणे सर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. शाळेत असताना शिक्षकांनी कसे घडवले, शिक्षणात आणि शिस्तीत कसा हातभार लावला याच्या गोड आठवणी सर्वांनी शेअर केल्या. काही विद्यार्थी पोलिस दल, सैन्य, जिल्हा परिषद, शिक्षक सेवा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

हे सर्व ऐकून माजी शिक्षकांना देखील आनंद झाला.शिक्षकांनीही चितळी शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना शाळेला आपले माहेर मानल्याचे नमूद केले.अनेक शिक्षकांचा प्रवास याच शाळेतून सुरू झाला होता त्यांनी येथे दीर्घ सेवा दिली आहे. चितळीतील विद्यार्थ्यांकडून मिळालेलं प्रेम आणि जिव्हाळा कायम लक्षात राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे स्नेहमेळावे पुन्हा व्हावेत, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व मित्रांना एकत्र येण्याचा योग जुळून आला मच्छिंद्र गलांडे, मच्छिंद्र शिंदे, मनोज हजारे,हंसराज बर्वे,रवींद्र चौधरी,संदीप काळे,बाळू कुऱ्हाडे, गणेश मूसंडे, अमित डोसी यांच्यासह सर्व वर्गमित्रांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी कार्यक्रमात किरण वैराळ यांच्या उत्कृष्ट गायनातून संगीत रजनी पार पडली यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी चांगदेवनगर येथील सप्तपदी लॉन्सचे सर्वेसर्वा नवले साहेब (DYSP) यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचा निर्धार सर्वांनी घेतला. जुन्या आठवणींना उजाळा देतानाचा हा क्षण माजी विद्यार्थ्यांसाठी कायमचा गारवा देणारा ठरला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!