कोपरगाव तालुकामहाराष्ट्र

आम्ही साडेसातशे ढाप्यांचा हिशोब देतो; विरोधकांनी ४ हजार कोटींचा विकास दाखवावा-नगराध्यक्ष पराग संधान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – विरोधकांनी मागील चार वर्षांत ज्या पद्धतीने कामं केलं, त्या पद्धतीने त्यांना सगळं दिसत आहे. त्यांनी जेवढी तत्परता या कामाच्या दरम्यान दाखवली, तेवढीच तत्परता त्यांनी ४००० कोटी रुपयांचा हिशोब द्यायला दाखवायला पाहिजे होती. मी स्वतः तसेच आमचे सर्व नगरसेवक शहरात बसविण्यात आलेल्या साडेसातशे ढाप्यांचा हिशोब देतो. आम्ही एक ना एक ढापा मोजून देण्यास तयार आहोत.मात्र विरोधकांनी ४ हजार कोटी रुपयांचा विकास जनतेला दाखवून द्यावा,आम्ही त्याबरोबर फिरण्यास तयार आहोत.त्यांनी आमच्याबरोबर फिरायची तयारी दाखवावी,असे खुले आव्हान नगराध्यक्ष पराग संधान यांनी विरोधकांना दिले.

 

ज्याला प्रामाणिकपणे काम करायचे आहे तो माणूस विरोधकांकडे कधीच लक्ष देत नाही. कोपरगावात त्यांचा पराभव होऊन सत्ता परिवर्तन झाल्याचे विरोधकांना सध्याही मान्य होत नसून, विरोधकांनी सहा वर्षांत केलेले काम पाहूनच कोपरगावच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. डोंगर पोखरायचा आणि उंदीर काढायचा अशी गत विरोधकांची झाली आहे. विरोधकांच्या काहीच लागत नसून मात्र आम्ही आमचे तोंड उघडून पेन ड्राइव्ह दाखवले तर खूप काही मिळण्यासारखे आहे. विरोधक स्क्रिप्टेड पत्रकार परिषद घेतात. त्यांनी स्वतः पत्र दिले आहे. त्यांना माझे आजही आव्हान आहे, त्यांनी आत्ताच्या स्थितीत नगरपालिकेमध्ये यावे, मी त्यांना साडेसातशे ढापे पूर्ण मोजून दाखवायला तयार आहे.

 

यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुठलेही श्रेय घेतलेले नाही. नगरपालिकेच्या हद्दीमधील बंद पडलेली कामे पुन्हा सुरू केलेली आहेत.मला कुठलेही श्रेय घ्यायचे नाही, फक्त जनतेचे काम करायचे आहे. विरोधकांचा चष्मा पिवळा असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसत आहे. नगरपालिका हद्दीमध्ये आज स्वच्छ पाणी आलेले आहे आणि नागरिकांनी भारतीय जनता पार्टी व आरपीआयच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे.

 

ज्यांना मिळालेले पत्र समजलेले नाही त्यांच्याशी काय बोलावे आणि ज्यांनी पत्र दिले त्यांना उत्तर मिळाले, त्यांनी त्यावर बोलले पाहिजे होते. कारण त्या पत्रात काय लिहिले आहे याची विस्तृत माहिती आम्ही लवकरच देणार आहोत.नगरपालिका कारभार ज्याला समजतो त्यालाच ते सांगण्यात अर्थ आहे.कारण कोणतेही काम झाल्यानंतर त्याची बिले होतात, एमबी रेकॉर्ड होते आणि मग ते रेकॉर्डवर येते. आम्ही त्यांना सांगितले होते की जिथे मागणी येईल तिथे ढापे टाका. त्यानुसार प्रत्येक प्रभागात ढापे टाकण्यात आले आहेत. मध्ये काही काळ आचारसंहिता लागू असल्यामुळे सर्व कामे थांबली होती. लवकरच त्याची बिले होऊन साडेसातशे एक ना एक ढापा आम्ही मोजून देऊ, असेही नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!