
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागात सुरू केलेला कृषी, शैक्षणिक आरोग्य, अध्यात्मिक इत्यादी क्षेत्रातील विकासाचा वारसा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जोपासला व ग्रामीण जनतेला नवीन दिशा देण्याचे महान कार्य त्यांनी केले असल्याचे प्रतिपादन प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी केले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत आयोजित पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३ व्या जयंती समारंभात डॉ.कदम बोलत होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप महाले,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश दळे,कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष शिरसागर , अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.चंद्रकला सोनवणे,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुरवातीला डॉ. प्रवीण गायकर यांनी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.रमेश जाधव यांनी केले.
