प्रवरा शिक्षण संस्थालोणीशैक्षणिक

परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रवरा प्रयत्नशिल करते – डॉ.सुष्मिता विखे पाटील

प्रवरा कृषि शास्त्र संस्थेत आयोजित अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ उत्साहात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ . बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी आलेला विद्यार्थी हा जीवनात परिपूर्ण होईल या उद्देशाने संस्था नेहमी प्रयत्न करत असते हे विद्यार्थी आयुष्यात एक सृजनशिल नागरिक होतात असे प्रतिपादन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुष्मिता विखे पाटील यांनी केले आहे. 

 

प्रवरा कृषि शास्त्र संस्थेत आयोजित अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा . दिलीप महाले , कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . निलेश दळे , कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आशिष क्षिरसागर , अन्नतंत्रज्ञान महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. चंद्रकला सोनवणे तसेच सर्व विद्यार्थी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रवरा कृषी शास्त्र संस्थेतील प्रथम , द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी मागील चार वर्षात संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आमचे भविष्यात चांगले करिअर होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद केले.प्रवरा कृषि शास्त्र संस्थेचे संचालक डॉ . उत्तमराव कदम यांनी संस्थेने गेल्या वर्षभरात राबविलेल्या शिवार फेरी, बिल्डिंग प्रवरा, पालक मेळावा, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, कॅम्पस मुलाखती , संशोधन प्रकल्प, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा इत्यादीमुळे प्रवरेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे करिअर निश्चितच उज्ज्वल होणार असल्याचे सांगितले.सदर निरोप समारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थी आदींनी प्रयत्न केले. 

 

लोणी या ठिकाणी शिक्षण घेत असताना मोठा आत्मविश्वास मिळाला. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून शेतीमध्ये काम करता आले याचा निश्चित फायदा आम्हा विद्यार्थ्यांना होणार आहे या माध्यमातून आम्ही चांगल्या नोकरीबरोबरच चांगली शेती ही करू शकतो आणि शेती व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना प्रत्यक्ष कृतीतून मिळालेले मिळालेले ज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!