
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
श्रीरामपूर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रा.ब. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर, आणि स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “Youth for My Bharat” आणि “Youth for Digital Literacy” अभियानांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन मु.पो. बेलापूर खुर्द, ता.श्रीरामपूर येथे करण्यात आले आहे. शिबीराचा कालावधी ३ जानेवारी २०२५ ते ९ जानेवारी २०२५ असा आहे.शिबिरादरम्यान, ४ जानेवारी २०२५ रोजी स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह विरोधी जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये दोन्ही महाविद्यालयांतील १२५ युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पदयात्रेच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.बाबासाहेब तोंडे, प्रा. डॉ. भागवत शिंदे, प्रा. पटेल, डॉ.किरण थोरात, प्रा. किरण अमोलिक, ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच ॲड.दीपक बारहाते, ग्रामसेवक टी. के. जाधव, कर्मचारी विकी जाधव, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम, युवा निर्माण प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक विकास सुतार, तसेच स्वयंसेवक मच्छिंद्र शिंदे,अंजय सोनवणे, प्रीतम जगताप,शुभम डहाळे,सलीम शेख यांनी पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.
“या पदयात्रेनंतर सर्व सहभागी युवक-युवतींनी, ग्रामस्थांनी आणि पदाधिकारी यांनी “बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा” घेऊन बालविवाहमुक्त समाज घडविण्याचा निर्धार केला. या उपक्रमाने ग्रामस्थांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक संदेश दिला.
