बिबट्याचा हल्ला

चितळी-दिघी रोड लगत असलेल्या दीपक वाघ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्याने जाळी तोडून आत केला प्रवेश बिबट्याच्या हल्ल्यात ३०० पेक्षा अधिक कोंबड्या मृत्युमुखी  

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

राहाता-तालुक्यातील चितळी मध्ये बिबट्याची दहशत संपण्याचे नाव अजून घेत नसून चितळी-दिघी रोड लगत असलेल्या दीपक वाघ यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये (दि.२२) जानेवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने तब्बल ३०० पेक्षा अधिक कोंबड्यांचा पडशा फाडला आहे याघटनेमध्ये शेतकरी दीपक वाघ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.

 

सदर घडलेल्या घटनेबाबत कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सूचित करण्यात आले असून घटनेचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले आहे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल तीनशे पेक्षा अधिक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याने दीपक वाघ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेचा वनविभागाने त्वरित पंचनामा करावा तसेच लवकरात लवकर संबंधित बिबट्याचा बंदोबस्त करावा व तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी दीपक वाघ यांनी वनविभागाकडे केलेली आहे.

 

सविस्तर घडलेली घटना अशी, की  चितळी दिघी रोड लगत दीपक वाघ यांच्या मालकीचे पोल्ट्री फार्म असून सदर पोल्ट्री फार्म मध्ये जवळपास ४०० पक्षी आहेत (दि.२१) च्या पहाटेच्या सुमारास बिबट्याने पोल्ट्री फार्मची जीर्ण झालेली जाळी तोडून प्रवेश केला.एकामागे एक अश्या तब्बल ३०० पेक्षा अधिक कोंबडयांना मृत्यूमुखी पाडले असून (दि.२१) सकाळ च्या सुमारास दीपक वाघ हे नेहमी प्रमाणे पोल्ट्री फार्मवर पाहणी करण्यासाठी गेले असताना बिबटयाने कोंबड्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे यांच्या निदर्शनास आले पोल्ट्री फार्म मध्ये तब्बल ४०० कोंबड्या असल्याचे शेतकरी दीपक वाघ यांनी सांगितले आहे बिबट्याच्या हल्ल्यात लाखो रुपयांची नुकसान झालेले आहे व बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

 

महिनाभरापूर्वीच चितळी परिसरातील बी.जे साळुंखे पेट्रोल पंपनाजीक बिबट्याने मोठी भीती पसरवली होती याच दरम्यान रस्त्याने ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांवरती बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडून एक महिना उलटला असून त्यानंतर अनेकदा चितळी परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा वनविभागाने अनेक उपाययोजना अंमलात आणून ही बिबट्या जेरबंद होत नसून वनविभागाने परिसरात असलेल्या बिबटयाला शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला असून तरी मात्र वनविभाग बिबटयाला जेरबंद करण्यास सार्थ अपयशी ठरत आहे चितळी परिसरात व गावातअनेक ठिकाणी पिंजरे लावून ही काहीच फायदा होत नसल्याने बिबट्या त्यात अडकत नाही बिबट्याला ठार करायची मागणी मध्यंतरी चितळी परिसरातील नागरिकांनी केली होती परंतु ;ही मागणी वनविभागाने नामंजूर केल्याचे समजते बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत परंतु या उपायोजना सपशेल फेल ठरलेल्या आहेत. वनविभाग बिबट्याला जेरबंद कारण्यासाठी ठोस पावले उचलले जात नसल्याचा आरोप चितळी परिसरातील ग्रामस्थांकडून व नागरिकांकडून होत आहे बिबट्याचा बंदोबस्त करणेकामी कोपरगाव वनविभागाने आता ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सर्वच ग्रामस्थांनी सांगितले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!