
(प्रतिनिधी:- वैभव ताजणे/आश्वी)
संगमनेर:- कर्तव्य दक्ष बजरंग दलाच्या गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे कत्तलसाठी घेवून जाणाऱ्या ४ गायांना जीवदान मिळाले असून सगमनेर लोणी रस्तावर चिंचपुर शिवारा येथे हॉटेल वृदावन समोर तरूणांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या मदतीने कत्तलसाठी घेवून जाणाऱ्या चार गायांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.याप्रकरणी आश्वी (ता.संगमनेर) पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३३ / २०२४ बी एन एस २०२३ कलम अन्व्यय प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (३अ) ,९ सह प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पोलीस कॉनस्टेबल जयश्री दुधवडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमुद आहे की, १८ डिसेंबर रोजी ड्युटीवर असताना ११२ वर दुपारी १ वाजुन १८ मिनिटांनी नियंत्रण कक्ष अहिल्यानगर यांना फोन व्दारे माहिती देवून कळविण्यात आले की, संगमनेर लोणी रस्तावरील चिंचपुर शिवारा येथील हॉटेल वृदावन समोर २ इसम २ गाड्यामधुन कत्तलीसाठी ४ गाई घेऊन जाणार आहे हीच बाब येथील काही तरुणांच्या लक्षात आली यावेळी येथील सतर्क तरुणांनी या दोन्ही गाड्यांचा पाठलाग करून चार चाकी वाहणासह चार गायांना तरूणांनी पकडले होते.
यावेळी मदत पाहीजे असल्याचे तरुणांकडून भ्रमणध्वनिद्वारे तक्रार नियंत्रण कक्षाला सांगण्यात आले.त्यावेळी पो कॉ जयश्री दुधवडे व चालक पो कॉ शांताराम झोगडे सरकारी वहनामधुन घटणास्थळी दाखल झाले.तसेच सहाय्यक फौजदार पाटोळे व पो कॉ शिंदे हे घटनास्थळी पोहचले व तात्काळ कारवाईचे सूत्र फिरवण्यात आले.यावेळी घटनास्थळी टाटा एस गाडी नं (एम एच १२ एफ डी ६८४०) तसेच नंबर नसलेली टाटा एस गाडी मध्ये प्रत्येकी २ अश्या एकुन ४ गाया असल्याचे तरुणांच्या निदर्शनास आले.अंदाजे वय १२ वर्षे, १० हजार रूपये किमंतीची ताबड्या पांढऱ्या रंगाची तसेच अंदाजे वय १३ वर्षे, काळ्या व पाढऱ्यां रंगाची एक गाई किंमत ९ हजार रुपये तसेच नंबर नसलेली टाटा एस गाडी किमंत ३ लाख २२ हजार मध्ये काळ्या पांढऱ्या रंगाची वय वर्षे १२ ची १ गाय अंदाजे किंमत १० हजार तसेच दुसरी काळ्यां रंगाची गाय वय अंदाजे ११ वर्षे १२ हजार किंमतीची गायी असा एकुन ४ लाख ८२ हजार रूपये किमंतीचा माल पकडण्यात आला असून
गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर गाडी चालक शब्बीर सिकंदर शेख वय ४५ वर्षे रा. निबांळे तालुका संगमनेर तसेच प्रविण अन्तोन गायकवाड वय ३३ वर्षे रा पिँप्रीलोकाई तालुका राहाता येथील रहिवासी असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व पुढील तपासाचे सूत्रहाती घेतले आहे. या सदर्भात आश्वी (ता.संगमनेर) पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३३ / २०२४ बी एन एस २०२३ कलम अन्व्यय प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (३अ) ,९ सह प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस यंत्रणेने हाती घेतला आहे.
“एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या कार्यकाळा मध्ये गो- मातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला असतांना ही संगमनेर सह श्रीरामपुर तालुक्यात अनेक कत्तल खाने राज-रोस पणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.”
“गोरक्षणासाठी जे तरूण युवक समोर येवून काम करतात त्यांना ही अनेकदा या कत्तलखाना चालकांकडुन दम बाजी केली जात असल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात अनेकदा आश्वी पोलीस स्टेशनच्या आवारात गायांचा व्यवसाय करणारे व्यक्ती गायांची गाडी पोलिसांनी हस्तगत केल्यावर तसेच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना पुन्हा सोडविण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई न करण्यासाठी पोलिसांना पैश्याचे आमिष दाखवले जाते यासाठी अनेक एजंट मध्यस्थी करताना दिसतात.”
अनेकदा आश्वी पोलीस ठाण्यातील पोलीसांचा या अनोळखी एजन्सी सपंर्क होत असल्याची गावामध्ये चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासन व एजंट यांच्यातील साट्या-लोट्यामुळे अनेकदा कत्तलखान्यांवरती कारवाई होत नसल्याची बाब दिसून येत आहे.
