
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रात शेती क्षेञात घरात असलेल्या महिलांसाठी पाच दिवसीय नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण कालावधीत संपन्न झाले.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ राहाता तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शैलेश देशमुख, तसेच कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकरी निवड पद्धती, नैसर्गिक निविष्ठा बनविण्याची पद्धत, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, उत्पादनाचे प्रमाणिकरण, विपणन व्यवस्थापण, शेती शाळा, गट बैठका, कृषी सखीच्या जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.नैसर्गिक शेती मध्ये पीक पद्धती नियोजन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण यावर मार्गदर्शन शैलेश देशमुख यांनी केले.अन्नद्रव्ये व्यवस्थापन,एकात्मिक खत व्यवस्थापन,जिवाणू खते आणि सेंद्रीय खते याविषयी मृदा विभागाचे शांताराम सोनवणे मार्गदर्शन केले. पिकांतील कीड रोग नियंत्रण,जैविक औषधे,वनस्पतीजन्य किडनाशके,दशफर्णी अर्क तयार करणे वापर याविषयी भरत दवंगे यांनी माहीती दिली.
उद्यान विभागाचे डॉ. विलास घुले यांनी फळबागेतील नैसर्गिक शेती, नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसिद्धीसाठी समाज माध्यमांचा वापर तसेच विस्तार विभागाच्या डॉ प्रियंका खर्डे यांनी नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी तर गृह विज्ञान विभाग प्रमुख सौ सज्जला लांडगे यांनी नैसर्गिक शेती आणि पोषण यावर मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण दरम्यान गोगलगाव येथील नैसर्गिक शेतीनिष्ठ शेतकरी गुळवे यांनी उपस्थित कृषी सखींना नैसर्गिक शेतीसाठी त्यांच्या अनुभवाद्वारे प्रोत्साहित केले.
महिलांची एक दिवसीय नैसर्गिक प्रात्यक्षिक प्लॉट, पिंपळस येथे क्षेत्रीय भेट आयोजित केली होती. त्यामध्ये प्रगतशील शेतकरी श्री अमोघ गुरावे यांनी ते करत असलेले बहुस्तरीय पिक पध्दती , नैसर्गिक शेती बद्दल अनुभव कृषी सखींना सांगितले.या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान राहता, संगमनेर, कोपरगाव आणि अकोले असे ४ तालुक्यातून एकूण ६४ कृषी सखी प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या.
