
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – सामाजिक एकोपा आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सामाजिक समरसता मंच कार्यरत आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या सत्काराचे आयोजन समरसता मंचच्या वतीने करण्यात आले. समाजाला प्रेरणा देणारे त्यांचे कार्य सर्वांसमोर यावे, हा हेतू त्यामागे आहे, असे प्रतिपादन सामाजिक समरसता मंचचे जिल्हा संयोजक वसंत कदम यांनी केले.
सामाजिक समरसता मंचच्या माध्यमातून राहाता येथील कला,वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात कदम बोलत होते. या कार्यक्रमात जयमाला कुलकर्णी (सांस्कृतिक व लेखन), सारिका आहेर (शैक्षणिक), गायत्री म्हस्के (सामाजिक), माधुरी शिंदे (धार्मिक), संगीता मालकर (शैक्षणिक व सामाजिक), माधुरी जावळे (तंत्रज्ञान), सुधाराणी बेदलामाडी (सेवाभाव) या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.योग प्रशिक्षक वृंदा कोऱ्हाळकर, प्राचार्य सोमनाथ घोलप, विठ्ठल जाधव, मयुरेश नवले, प्रा. रघुनाथ गोंदकर, अनिल पिपाडा, ललित मुनावत, अजय गरूड, राजेंद्र पवार, नीलेश जाधव, शुभांगी कदम, सुरक्षा कुलकर्णी, सुवर्णा म्हस्के, स्वरूपा कुलकर्णी, सारिका मुनावत आदी यावेळी उपस्थित होते.
समरसता वृंदा कोऱ्हाळकर म्हणाल्या, मंचच्या सामाजिक माध्यमातून समतेचा संदेश दिला जातो. सर्वांना समान संधी आणि सदभाव यासाठी हे व्यासपीठ कार्यरत आहे. या कार्याच्या विस्तारासाठी देशभरात हजारो कार्यकर्ते कार्यरत आहेत. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आला. सध्याच्या वातावरणात सामाजिक समरसता मंचच्या कार्याची गरज आहे. प्राचार्य सोमनाथ घोलप यांचेही भाषण झाले. सामाजिक कार्यकर्त्या उमाताई वहाडणे यांनी उपस्थितांना सामाजिक समरसतेची शपथ दिली. सुनीता जैन यांनी सूत्रसंचालन केले. स्वरूपा कुलकर्णी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
महिलाही आपल्या कर्तुत्वांना आपली वेगळी ओळख निर्माण करू शकते महिला दिनाच्या माध्यमातून महिलांना मिळणारे प्रोत्साहन हे प्रेरणादायी असते आणि यातूनच नवी ऊर्जा काम करण्यासाठी मिळतअसते असे पुरस्कार प्राप्त सौ. गायञी म्हस्के यांनी सांगितले.
