
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा )
अहिल्यानगर (ता.२१) :नेवासा तालुक्यातील श्री.ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजमध्ये स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाने ३०० विद्यार्थ्यांसाठी बालविवाह, बाल लैंगिक शोषण आणि मोबाईल दुरुपयोगा संदर्भातील जागरूकता निर्माण करण्यासाठी सत्राचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. राधाताई मोटे होत्या विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आयोजित सत्रामध्ये विद्यार्थ्यांना बालविवाहाच्या सामाजिक व मानसिक परिणामांची माहिती देऊन त्यातून होणाऱ्या हानिकारक परिणामांवर चर्चा करण्यात आली. तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक स्नेहालयच्या उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री.प्रविण कदम यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहाच्या दुष्परिणामांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले, की “बालविवाह आणि बाल लैंगिक शोषण ही समाजासाठी धोकादायक ठरतात.
आपल्या कृतींना जबाबदारीची जोड दिल्यास आपण आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो. मोबाईलचा योग्य व जबाबदार वापर हाच युवकांच्या यशाचा आधार ठरू शकतो.असे ते मार्गदर्शन करताना म्हणाले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश संवाद विभागाचे प्रा.देविदास साळुंके यांनी केले.कार्यक्रमात स्नेहालयच्या उडान प्रकल्पातील पूजा दहातोंडे, सीमा जुनी, युवा निर्माण प्रकल्पाचे विकास सुतार, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते.सत्रादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.बालविवाह,बाल लैंगिक शोषण आणि मोबाईलच्या गैरवापराविषयी गैरसमज दूर होऊन विद्यार्थ्यांना समाजातील सकारात्मक बदलासाठी प्रेरणा मिळाली.स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या वतीने शाळा व महाविद्यालयांना अशा उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
