
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – श्रीमान दत्तोपंतजी ठेंगडी यांनी भारतीय किसान संघाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांची एकजूट करून देश पातळीवर मोठी शेतकरी चळवळ उभारली. देशातील लाखो शेतकरी चळवळीच्या माध्यमातून संघटनेत एकत्र आले.भारत देशामधील महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये भारतीय किसान संघ गेल्या ४६ वर्षापासून कार्यरत असून.शेतकऱ्यांच्या अडचणी शांततेच्या मार्गाने सोडवत आहे.किसान संघ राज्यातील प्रत्येक गावातील तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे.शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी.यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात किसान संघाच्या वतीने शेतकरी मेळावे घेवून मार्गदर्शन केले जात आहे.भारतीय किसान संघ शेतकऱ्यांना बळ देवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे.असे मत ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी व्यक्त केले.
शिर्डी शहरात राहाता तालुक्याच्या वतीने भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नेते गंगाधर चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय किसान संघाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता,व बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव गोंदकर होते.
यावेळी जय बलराम जय किसानच्या घोषणा देण्यात आल्या.राजस्थान राज्यामधील कोटा या गावी (दि.४) मार्च १९७९ रोजी श्रीमान दत्तोपंतजी ठेंगडी यांनी भारतीय किसान संघटनेची स्थापना केली.शेतकरी हिताची चळवळ उभी करून शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे काम करत आहे.स्थापना दिनाचे औचित्य साधून तालुका पदाधिकाऱ्यांची तालुकास्तरीय बैठक ‘पार पडली, याबैठकीत भारतीय शेती व शेतकरी यावरील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते गंगाधर चौधरी,किसान संघांचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव गोंदकर ,सिताराम गोंदकर, अनिल मते, अनिल मते,गंगाधर साबदे,रंगनाथ चौधरी, प्राचार्य अ.नि चौधरी,बी.डी. गवारे, दिलीप कुलकर्णी,राहाता तालुकाध्यक्ष सिताराम चौधरी, संजय दंडवते, राजेद्र सांबारे, अशोक कोते आदींसह भारतीय किसान संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
