
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – ‘कदाचित कुटुंबाने केलेल्या दुर्लक्षामुळे ‘तो वयोवृद्ध’ इसम निर्जन ठिकाणी भटकत होता.पोटच्या लेकरांनी सुद्धा या वयोवृद्धास जिवंतपणीच नरकयातना भोगायला रस्त्यावर सोडले होते.अंदाजे ७० वर्षीय वयोवृद्ध एखाद्या शासकीय व खाजगी आश्रमात असण्याऐवजी तीव्र थंडी वाऱ्याचा व उन्हाचा तडाखा सोसत रस्त्यावर त्रास सहन करत मदतीची वाट पाहत होता’.राहाता-गणेशनगर-चितळी रस्त्यावरील रामपूरवाडी फाटा परिसरात आळंदी ओढ्या नजीक अडीच ते तीन महिन्यापासून हा वृद्ध रस्त्याच्या कडेला जीव धोक्यात घालून वास्तव्यास होता.त्या वयोवृद्ध इसमाचे गाव कुठले? नाव काय? याची पुरेपूर माहिती मिळत नव्हती वृद्धाच्या ओळखीचाही कुठला पुरावा उपलब्ध होईना.त्यावेळी परिसरातील नागरिकांनी वयोवृद्धासाठी अन्नपाण्याची सोय करून दिली.
अश्यातच तब्बल अडीच-तीन महिने उलटूनही हा इसम रस्त्यावरच राहायचा यादरम्यान जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर असणाऱ्या नामांकित सामाजिक संस्थाना संपर्क साधूनही ‘त्या’ सामाजिक संस्थानी पाठ फिरवली. निराधार वृद्धास मायेचा आधार दिला नाही.यादरम्यान वृद्धाच्या प्रकृतीने साथ सोडायला सुरवात केली.यातच वृद्धाच्या आयुष्याची व जीवनाची दोरी तुटली.रस्त्यावर राहून अनेक हाल आप्तेष्टा सहन करून अखेर वयोवृद्धास मृत्यूने गाठले.स्थानिकांनी याबाबत पोलिसांना सूचित केले.पोलीस प्रशासनाने घटनास्थळी येवून पंचनामा केला.मृतदेहास शवविच्छेदन करण्यास रुग्णालयात दाखल केले.
श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये रविवारी (दि.२३) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.नियमाप्रमाणे तीन दिवस मृतदेह ओळख पाठविण्यासाठी शवागारात ठेवण्यात आला.परंतु;या तीन दिवसात मृताची ओळख पाठविण्यासाठी कोणीही नातेवाईक आले नाही.परंतु; मृतदेहाला ठेवून तब्बल ७२ तासापेक्षा जास्त कालावधी उलटला होता.या पेक्षा जास्त वेळ मृतदेह ठेवता येत नसल्याने व वयोवृद्ध इसमाच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला नसल्याने पोलीस प्रशासनाने अनोळखी वयोवृद्ध इसमाचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले.यावेळी श्रीरामपूर तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड.कॉ तथा तपासी अंमलदार राजेंद्र लवांडे,पो.कॉ. संभाजी वारे, पोलिस हेड.कॉ.संजय पवार , यांनी माणुसकीच्या भावना जपत.मंगळवारी (दि.२५) अनोळखी वयोवृद्ध इसमाच्या प्रेतावर धार्मिक विधिवत पद्धतीने अंत्यसंस्कार करून आपले कर्तव्य बजावले आहे.
- शासकीय व सामाजिक संस्थांकडून वयोवृद्ध इसमाला कुठली मदत नाही.
राज्यातील अनेक शासकीय व सामाजिक संस्थांकडे स्थानिकांनी संपर्क साधून वयोवृद्धास आश्रमात भरती करावे अशी मदत मागितली होती.परंतु;सोशल मीडियावर फक्त मदत केल्याची छबी उमटवणार्या व पैश्याच्या भुकेलेल्या अनेक नामवंत शासकीय व सामाजिक संस्थांनी वयोवृद्धाचे वय खुप जास्त असल्याचे कारण सांगून माणुसकीच्या नात्याने का होईना पण तिळमात्र ही मदत केली नाही.ही खंत सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
मृतदेहाची ओळख पाठविण्यासाठी तीन दिवस साखर कामगार हॉस्पिटल मध्ये ठेवला होता. तरी मृतदेहाची ओळख पटली नाही.हा वयोरुद्ध इसम कदाचित कुणाच्या तरी कुटुंबातील सदस्य आहे.असे समजून माणुसकीच्या नात्याने पोलीस प्रशासनाने अंत्यविधी करण्याचे ठरविले.समाज्याच्या प्रती भावना जपून आम्ही वयोवृद्ध बेवारस इसमावर अंत्यसंस्कार करून कर्तव्य बजावले आहे.
-राजेंद्र लवांडे. पोलीस हेड.कॉ.,श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाणे
