
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बहुजन टायगर फोर्सचेच्या वतीने (दि. ३०) एप्रिल रोजी भव्य भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चितळी, शाखेच्या वतीने बहुजन टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संजय रूपटक्के यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादनाने झाली. “जय भीम” घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.”संजय रूपटक्के यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेवून सामाजिक न्यायासाठी लढा दिला आहे ते आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी बहुजन समाजासाठी जे सातत्यपूर्ण कार्य केलं आहे, त्याची दखल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेने घेवून ‘समाज भूषण’ पुरस्कार प्रदान केला आहे त्यांच्या कार्यातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट झाली आहे,असे गौरवद्वार आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे यांनी काढले.
चितळी येथील आरपीआय शाखा वीस वर्षांपासून सामाजिक समतेसाठी सक्रिय असून,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावी विचारधारेवर आधारलेले सामाजिक कार्य सातत्याने करत आहे. यातून शालेय साहित्य वाटप, जनजागृती अभियान, असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे.यावेळी भिमगीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक परिवर्तनासाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाउपाध्यक्ष योगेश बनसोडे, प्रकाश अण्णा चित्ते, दिवे सर, युवा नेते विक्रम वाघ, लक्ष्मण गायकवाड, फकीरा गायकवाड, कमलेश वाडेकर, बेलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवे, चितळी ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र वाणी, लहानु त्रिभुवन, बाबासाहेब थोरात, दादू बनकर बबलू बनसोडे यांचा समावेश होता.या कार्यक्रमास विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.
