(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
राहाता-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची हृदयद्रावक घटना घडली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हत्याकांडात दगावलेले सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याघटनेच्या निषेधार्थ राहाता तालुक्यातील रामपूरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे दोन दिवस कामकाज कडकीत बंद ठेवून मस्साजोग हत्याकांडाच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा रामपूरवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी राहाता तालुक्यातील रामपुवाडी गावचे सरपंच संदीप तुकाराम सुरडकर यांनी ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे यांना कामाकाज बंद ठेवण्याबाबत लेखी निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले आहे की बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याघटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही बुधवार (दि.१) व गुरुवार (दि.२) रामपूरवाडी ग्रामपंचायतीचे दोन दिवस कामाकाज बंद ठेवणार आहे असे सरपंच संदीप सुरडकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
