
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
नेवासा –मौजे सुरेशनगर (ता.नेवासा) येथील आदर्शगांवच्या सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी पाच लाख १७ हजार ६४९ रुपये ग्रामपंचायतमध्ये कागदोपत्री दाखवून केलेल्या भ्रष्टाचार कामी त्यांच्यावर त्वरीत कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी जलसमाधी घेणार असल्याची माहीती अमृत सुरेशराव उभेदळ यांनी राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाव्दारे इशारा दिल्याची माहीती उभेदळ यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
नेवासा तालुक्यातील आदर्शगांव सुरेशनगर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दीड वर्षात झालेल्या अमाप आणि अडमाप भ्रष्टाचाराचा पाढा ग्रामपंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ आणि ग्रामस्थांसह अमृत सुरेशराव उभेदळ यांनी यावेळी वाचून दाखवत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी शासन व उचस्तरावरील अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन केलेल्या सर्व तक्रारी बद्दल चौकशी केलेली असून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक तसेच शिपाईयांच्यामार्फत कागदोपत्री चालू असलेला भोंगळ कारभाराबद्दल दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ व बाबासाहेब उत्तम गायकवाड,अमृत सुरेशराव उभेदळ यांच्यांसह ग्रामस्थांनी केली आहे अमृत सुरेशराव उभेदळ यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात सुरेशनगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी केलेल्या भ्रष्टाचारांचा पाढाच यावेळी क्रमवार वाचून दाखविलेला असून या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची एकमुखी मागणी केली आहे.
सार्वजनिक विहिरीचा गाळ काढणे व जाळी बसणे व पाईपलाईन दुरुस्ती कामी कुठलेही काम न करता १,७२,३००/- लक्ष रुपयेचा भ्रष्टाचार तसेच दीड वर्षात केलेली स्ट्रीट लाईट खरेदी,दुरुस्तीमध्ये एकूण ३,०५,८४९/- लक्ष रुपयेचे खरेदी व दुरुस्ती बेकायदेशीर पणे दाखवून लाखोंचा रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे तर शिवम नांवे काहीही काम न करता बेकायदशीरपणे काढलेले १८,००० हजार रुपयेचा भ्रष्टाचार त्याचप्रमाणे वाचनालय कलर कामी वाचनालयाला कलर न देता बेकायदेशीर पणे काढलेले २१,५००हजार रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेऊन उच्चस्तरीय अधिकारी नेमून या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पूर्ण झालेली असून त्याकामी असणारे सर्व कागदपत्रे,छायाचिञ पुरावे तसेच छायांकन अमृत सुरेशराव उभेदळ यांनी चौकशी कामी समक्ष सुपूर्त केलेले असून त्या संदर्भात २० जानेवारी २०२५ पर्यंत संबंधित दोषी सरपंच शैला कल्याण उभेदळ,ग्रामसेवक कैलास इंगळे,ग्रामपंचायत शिपाई अविनाश उभेदळ,नेवासा पंचायत समिती शाखा अभियंता सुशील माळवे या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ प्रतिनिधी अमृत सुरेशराव उभेदळ हे ग्रामस्थांच्या उपस्थितीत २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी सकाळी १० वाजता प्रवरासंगम गोदावरी तीरावर जलसमाधी घेण्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलिस अधिक्षक अहिल्यानगर,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर,नेवासा तहसीलदार,नेवासा पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
कारवाई करा अन्यथा जलसमाधी घेणार..!
“सुरेशनगर ग्रामपंचायतीत घोटाळा करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी गोदावरी तीरावर जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमृत सुरेशराव उभेदळ यांनी नुकतेच दिले आहे.
अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात चालढकलपणा..!
“आदर्शगांव सुरेशनगर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम न करता शासनाच्या निधीवर डल्ला मारलेला असतांना आणि ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी सबळ पुरावे अधिकाऱ्यांकडे दिलेले असतांनाही कारवाई करण्यात चालढकलपणा होत असल्यामुळे या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचीच मुख संमती आहे का? असा संतप्त सवालही आक्रमक ग्रामस्थांनी उपस्थित करुन तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
