
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
राहाता: (ता.२१) – महाविद्यालयातील तरुणांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे निश्चितच प्रेरणादायी असतात.महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास होतो. वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. म्हणून नव्या पिढीने समर्पित वृत्तीने कलेचा विकास केला पाहिजे.असे मत प्रमुख अतिथी सुश्मिता विखे पाटील यांनी प्रतिपादन केले.
आप्पासाहेब धनवटे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लिट्ल एंजल्स स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज,पुणतांबा चे १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन मा.सुष्मिता विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रवरा शैक्षणिक संस्था यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी सुश्मिता विखे पाटील बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती माता आणि नटराजाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अडचणींवर मात करून आपल्यातील गुणवत्तापूर्ण कौशल्ये विकसित केले पाहिजे.संघर्षाला इच्छाशक्तीची जोड देऊन, स्वतःला यशस्वी करता आले पाहिजे.असेही यावेळी डॉ.सतीश सोनवणे म्हणाले.वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५-नृत्य तरंग अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला,नृत्य सादर केलेत.
याप्रसंगी आप्पासाहेब धनवटे मेमोरियल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सौ.धनश्री व डॉ. श्री.धनंजय धनवटे,विश्वस्त सौ.मनीषा व श्री.मनोज धनवटे, लिट्ल एंजल्स स्कूलचे अध्यक्ष श्री. दिपक धनवटे,उपाध्यक्ष श्री. दिपक नाईक, श्री.किशोर कदम, श्री.दत्तात्रय नळे, संचालिका सौ.वैजयंती धनवटे, व्हा. चेअरमन श्री.राहुल धनवटे, उप मुख्याध्यापक श्री.सुरेश पटारे व हर्षल भोसले सर यांनी सूत्र संचलन केले यांच्या सह विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मॅक केयर हॉस्पिटल अहिल्यानगर येथील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.श्री सतीश सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा चांगला फायदा करून घ्यावा.आपला बहुमूल्य वेळ मोबाईलमध्ये न घालविता अभ्यासमध्ये घालवावा. जीवनात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही.’
