शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

जळगाव (ता.राहाता) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (केंद्र वाकडी) येथे ‘जनजातीय पंधरवडा’ उत्साही वातावरणात साजरा’

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपारिक वेशभूषा साकारली

राहाता-जळगाव (ता.राहाता) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (केंद्र वाकडी) येथे ‘जनजातीय पंधरवडा’ उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवार (ता.१३) रोजी ‘जनजातीय पंधरवडा’ चे आयोजन करण्यात आले.

यावेळी याउपक्रमात सर्वच चिमुकले विद्यार्थी अगदी जोमाने सहभागी झाले उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जि.प.शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांची सकाळपासूनच लगबग सुरू होती.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान केली यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.आयोजित उपक्रमाच्य माध्यमातून आदिवासी बांधवांच्या जीवनशैली कशी असते याचे काही क्षण या आनंददायी प्रसंगातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनुभवायाला मिळाले. 

यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपारिक वेशभूषा साकारली एवढेच नव्हे तर नृत्यकला सादर करून सर्वांचे मने जिंकली आयोजित उपक्रमात जि.प प्राथमीक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा आदिवासी नेता यांच्या जीवन पटावर आधारित निबंध स्पर्धेत अगदी उत्साहपणे सहभाग घेतला बरोबरच वारली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आदिवासी जीवनशैलीचे वर्णन चित्रांमधून रेखाटून दाखवले.

यावेळी ग्रामस्थांसह,पालकांनी, शिक्षकांनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांवर जणू कौतुकाचा वर्षाव केला या प्रसंगी चिमुकल्यांना कौतुकाची थाप मिळताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अजूनही द्विगुणीत झाला यावेळी चिमुकल्यांना ‘जनजातीय पंधरवडा’ का साजरा केला जातो याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अहिरे यांनी मार्गदर्शन केले.’जनजातीय पंधरवडा’ यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मेगा बागुल, शिक्षक मारुती खरात,संतोष हेकरे यांनी परिश्रम घेतले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. गोरक्षनाथ चौधरी,उपाध्यक्ष शाम चौधरी, सर्व सदस्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे व उपक्रमाचे कौतुक केले. 

 

 

आदिवासी जमाती विषयी सर्वांना आदराची व आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना माहीत व्हावा असा उद्देश्य आम्ही उपक्रमाच्या निमित्त बाळगाला आहे.आदिवासी समाजातील प्रथा व कला बद्दल चिमुकल्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनात समाजासाठी सहानुभूती व आधाराची भावना निर्माण झाली पाहिजे आदिवासी समाजातील लहान मुलांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जनजातीय पंधरवड्याच्या दरम्यान जनजागृती करण्यात आली..:- संगीता आहिरे, मुख्याध्यापिका

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!