Uncategorized

राहाता बाजार समितीची प्रत्येक निर्णय शेतकरी हिताचा-  अण्णासाहेब म्हस्के पाटील

लोणी येथे म्हैस बाजार सुरु,पहीलाच व्यवहार २लाख ७० हजाराचा!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होत आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकर्यांच्या हितासाठी सुरू झालेल्या प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणी मुळे बाजार समिती राज्यात वेगळेपण दाखवून देत आहे.नव्याने सुरू झालेल्या म्हैस बाजाराच्या माध्यमातून परिसरातील म्हैस पालक, व्यापारी यांना मोठा आधार मिळेल असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.

 

 जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता यांच्या वतीने लोणी येथे म्हैस बाजार खरेदी विक्रीचा शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या शुभहस्ते झाला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती बापूसाहेब आहेर होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू,ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदूशेठ राठी, किसनराव विखे,संपतराव विखे, अशोकराव धावणे सुभाष गमे, बंडू लगड लक्ष्मण बनसोडे, बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे सर्व संचालक, व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते.शुभारंभ प्रसंगी झालेल्या पहील्याच व्यवहारात संतोष संपत गदाई आणि सुरेश ओंकार गदाई यांच्या म्हशीचा व्यवहार दोन लाख ७० रुपयांची बोली करून या बाजाराचा शुभारंभ केला.

 

 आपल्या मार्गदर्शनात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समिती वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित काम करत आहे. बाजार समितीच्या माध्यमातून कांदा,भुसार, भाजीपाला, डाळिंब त्याचबरोबर त्याचबरोबर गाई शेळी बाजार आणि आता म्हैस बाजार सुरू करून शेतकऱ्यांना मोठा आधार या माध्यमातून मिळाला आहे.

 

शेतकऱ्यांची फसवणूक बाजार समितीच्या माध्यमातून होणार नाही.याची काळजी बाजार समितीच्या व्यवस्थापनाकडून होत असल्याचे समाधान व्यक्त करून बाजार समितीच्या माध्यमातून सुरु होणारा पशुखाद्य निर्मिती कारखाना दुग्ध व्यवसायकांसाठी मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकां मध्ये ज्ञानेश्वर चौधरी यांनी बाजार समितीच्या विविध उपक्रमाची माहिती देत असतानाच पणन विभाग आणि विशेषता मंत्री विखे पाटील,माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार भिमराज निर्मळ यांनी मानले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!