(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी-गोपाल शिंदे
श्रीरामपूर – नगरपालिकेच्या नुकत्याच निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेविका सोनियाताई बिट्टू कक्कड यांच्या प्रभागात मागील अनेक दिवसांपासून अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली होती.गुरुनानक नगर परिसरात सतीश दादा पठारे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचून राहिला होता.

या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक उमेदवार यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ पाचारण करून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.

स्थानिक उमेदवार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.सदर कचराकुंडीची अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण परिसराची साफसफाई करून घेण्यात आली.या तत्परतेबद्दल प्रभाग क्रमांक 1 मधील समस्त नागरिकांनी आभार मानले आहे.




