
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषि अधिकारी आबासाहेब भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे चितळी येथे हाॅर्टसॅप अंतर्गत डाळिंब फळपीक शेतीशाळा संपन्न झाली. या शेतीशाळेस कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर शास्त्रज्ञ भरत दवंगे व विलास घुगे, मंडळ कृषि अधिकारी राहाता मधुकर कदम उपस्थित होते.
भरत दवंगे यांनी डाळिंब फळबागेतील आंबिया बहार व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग नियंत्रण, डाळिंबातील तेलकट डाग व मर रोगाचे लक्षणे व त्यावरील उपाययोजना, पिन होल बोरर नियंत्रण, डाळिंबामध्ये आच्छादनाचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.विलास घुगे यांनी डाळिंब फळबागेसाठी जमीन निवडताना घ्यावयाची काळजी तसेच डाळिंब फळपिकातील एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन, मातीपरीक्षण, डाळिंबाचे पान व देठ परीक्षण,पाणी व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मंडळ कृषि अधिकारी राहाता मधुकर कदम यांनी निर्यातक्षम डाळिंब फळबागेसाठी सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी चितळी गावचे कृषि सहाय्यक राजेश पऱ्हे यांनी प्रयत्न केले. ज्येष्ठ विधीज्ञ अशोकराव वाघ यांनी शेतीशाळेद्वारे शेतकऱ्यांना डाळिंबातील तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून त्याचा डाळिंब उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे सांगितले. तसेच सुधीर वाघ यांच्या डाळिंब बागेस प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या संख्येचे निरसन करण्यात आले.
या शेतीशाळेत डाळिंब उत्पादक शेतकरी दिपक वाघ, विक्रम वाघ, जीवन वाघ, सुधीर वाघ, राजेंद्र वाघ, शैलेश वाघ, अमोल वाघ, मंजिनाथ वाघ, सुभाष वाघ, विशाल गुळवे, रवींद्र वाघ, विकास वाघ, विनायक गुलदगड, जयदीप वाघ, शुभम गुळवे, अनिल वाघ, वाल्मीक शेळके , संभाजी तनपुरे, विजय चौधरी, सुरेश वारुळे, सुखदेव आदमाने, आण्णासाहेब आदमाने,राहुल गायकवाड इ. शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषि सहाय्यक राजेश पऱ्हे यांनी आभार मानले.
