सामाजिक

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जखमी नेत्रहीन खेचराला; गोदावरीतीरी उपचार देवून दिले जीवदान!

 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – उन्हाळ्याच्या कडक झळा पाण्याची भरमसाठ कमतरता त्यातच एखादा मुका व नेत्रहीन जीव जो दोन्ही डोळ्याने पूर्ण पणे अंध आहे आणि त्यातच त्याला त्याच्या नशीबावर व देवभरवश्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी सोडून दिले असावे? होय. हेच वास्तव नाकारता येत नाही. आज पुणतांबा येथील कार्तिकस्वामी मंदिर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर घाटाच्या कडेला नुकताच बघायला मिळाला आहे.परंतु पुणतांबे पंचक्रोशीतील कर्तव्यदक्ष बजरंग दलाच्या सदस्यांनी त्या अंध स्थितीतील खेचराला बघितल्यानंतर माणुसकी जपून त्याचा जीव वाचवण्यास मदत केली.

बर्‍याच दिवसापासून आपले दोन्ही नेत्रगमावलेला खेचर प्रजातीचा घोडा पुणतांबा ता.राहाता या ठिकाणच्या  गोदावरीमाईच्या तीरावर वास्तव्यास राहत आहे. विशेष म्हणजे हा खेचर आपल्या दोन्हीही डोळ्याने अंध असल्याचे समजते तरीही अश्या परिस्थितीत ४२ ते ४३ डिग्री सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या ऊन्हात त्या नेत्रहीन घोड्याची पोटासाठी भटकंती सुरूच होती. डोळ्याचा नेत्रहीन अवस्थेबरोबरच त्याच्या अंध डोळ्याला कसलीतरी मोठी ईजा झाली होती. मुक्या प्राण्याच्या डोळ्यातून वाहणारे भरमसाठ रक्त यातून खेचराला होणारा त्रास हे सर्व दिसून येत होते. परंतु तो मुका प्राणी तो करणार तरी काय सांगू पण शकत नाही आणि बोलू पण शकत नाही  अश्या वेळी हा सर्व प्रकार पुणतांबा पंचक्रोशीतील बजरंग दलाच्या कर्तव्यदक्ष सदस्यांनी समक्ष बघीतला त्या खेचऱ्याची झालेली अत्यंत दुःखद अवस्था पाहण्याजोगती नव्हती हे तर जरी मुका प्राणी असला, त्याला बोलता येत नाही,आणि आपल्या भावना सांगता येत ही नाही,परंतु त्याला मदतीची अत्यंत गरज होती.

यावेळी क्षणाचा विलंब न करता मुक्या जिवांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या डाॅक्टारांना संपर्क केला.बर्‍याच डाॅक्टरांचा उपचारासाठी नकार आला पण शेवटी सरकारी वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेले डॉ.श्री.अभंग व त्याचे सहकारी श्री.अंबडकर यांनी उपचाराची तयारी दाखवून ज्या ठिकाणी घोडा वेदनेने तडफडत होता त्या ठिकाणी जाऊन त्याच्या डोळ्यावर झालेल्या जखमेवर तत्काळ उपचार केले.उपचारा दरम्यान त्या मुक्या जीवाचे हाल बघवत नव्हते पण परिस्थिती अतीशय सावधगीरीने हाताळून डाॅक्टर अभंग सर यांनी थोड्याच वेळात आपल्या अनुभवाच्या जोरावर घोड्याच्या वेदना क्षमवल्या.

थोड्याच वेळात त्या मुक्या व अंध असलेल्या मुक्या जीवास बर वाटले व त्यानंतर काही वेळातच त्याने जवळ असलेल्या कुरणावर गवत खाल्ले व पाणी ही प्यायले. हे बघून उपस्थित सर्व मंडळीना आनंद झाला व डाॅ.अभंग व सहकारी अंबडकर व बजरंग दलाचे सर्व सहकारी यांचे विशेष कौतुक होत आहे. उपचार पूर्ण झाल्यावर त्या घोड्याला गोशाळेत सोडणार असल्याचे बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी सांगीतले.

 

पुणतांबे पंचक्रोशीतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत अनेक गाई लहान वासरे कत्तली पासून वाचवून गोशाळेत सुखरूप पोहचवण्यात बजरंगदलाचा मोलाचा वाटा आहे. मुक्या जीवावर असलेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, हिंदुधर्मात गाईचे असलेले देवाचे स्थान या सर्व गोष्टींमधून निर्माण झालेली ही आवड व कर्तव्य दक्षता बजरंगदलाच्या कार्यावर समाजातून स्तुती सुमने उधळण करतात.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!