राजकीयसामाजिक

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांचे मोठे योगदान – गंगाधर चौधरी

संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक दिवंगत सहकारमहर्षी स्व.शंकररावजी गेणूजी कोल्हे यांचे पुण्यस्मरण व प्रेरणादिनानिमित्त वाकडीत अभिवादन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी खुप मोठे योगदान देवून विविध क्षेत्रात उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केले त्यांचे नेतृत्व हिमालय पर्वता सारखे उत्तुंग होते त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांचे कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लागले असल्याचे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी केले.

राहाता तालुक्यातील वाकडी येथील मारुती मंदिरात बुधवार (दि.२६) रोजी संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक दिवंगत सहकारमहर्षी स्व.शंकररावजी गेणूजी कोल्हे यांचे पुण्यस्मरण व प्रेरणादिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येवून सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी जळगावचे जेष्ठ नेते गंगाधर चौधरी होते.व्हा.चेअरमन शिवाजी तात्या लहारे माजी संचालक भाऊसाहेब चौधरी संचालक अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, विठ्ठलराव शेळके, प्रभाकर पानसरे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लहारे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी दत्तगुरु पतसंस्था संचालकपदी बी.एल आहेर यांची नियुक्ती झाली तसेच वाकडी गावचे सुपुत्र श्री.शिंदे यांचा सैन्यदलात भरती झाल्याबद्दल तर सुनिल लहारे यांना इन्शुरन्स क्षेत्रातील एमडीआरटी हा बहुमान प्राप्त करून टाटा कंपनी मार्फत इटली, अझरबैजान युएसए येथे पुरस्कारासाठी साठी निवड झाल्याबद्दल येथोचित सत्कार केला.विजय शेळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रास्ताविक बी. एल आहेर यांनी केले.आभार संचालक विष्णुपंत शेळके यांनी मानले.

चौधरी पुढे बोलताना म्हणाले,सहकारमहर्षी स्व.शंकरराव गेणूजी कोल्हे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले आहे.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्व.शंकरराव कोल्हे यांनी १९५० मध्ये सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरवात केली त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले त्यांचा सरपंच ते कॅबिनेट मंत्री पदापर्यंतचा प्रवास संघर्षमय होता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आंदोलनने करत सामाजिक कार्य केले संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक संस्था ची उभारणी करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला गणेश कारखाण्याला स्व.कोल्हे यांच्या माध्यमातून पुन्हा नवसंजीवनी मिळाली असून त्यांनी प्रामाणिकपणे जे काम हाती घेतले ते काम केलेच आहे याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे नेहमीच आग्रभागी राहिले आहे.असे चौधरी बोलताना म्हणाले.

या प्रसंगी गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे,संचालक विष्णुपंत शेळके,संपतराव चौधरी,अनिल गाढवे,आलेश कापसे यांच्यासह गणेशचे माजी उपाध्यक्ष शिवाजी लहारे,माजी संचालक भाऊसाहेब चौधरी,संजय शेळके,विक्रम वाघ, वाकडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच रोहिणी आहेर,सदस्य कल्पना लहारे,सोसायटी अध्यक्ष संजय भवर,उपाध्यक्ष तात्यासाहेब गोरे,नवनाथ शेळके,कैलास लहारे,ऍड.बबलू लहारे,राजेंद्र लहारे,विजय शेळके,माजी सरपंच माजी सरपंच अनिल शेळके,माजी उपसरपंच ज्ञानदेव शेळके,एकनाथ शिंदे,नितीन एलम,नितीन साबदे,बापू गोरे,कैलास लहारे,ऋषिकेश आहेर, अमोल कापसे,भाऊसाहेब लबडे, मिलिंद लहारे,सचिन आहेर,रंगनाथ चौधरी,मछिंद्र चौधरी,गंगाराम एलम, यांच्या lसह वाकडी- धनगरवाडी- जळगाव-चितळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर,समस्त सोसायटी संचालक मंडळ वाकडी ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य ग्रामस्थ,विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!