
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – महाविद्यालयातील तरुण पिढीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांचे पारायणे करून शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येक घरोघरी पोहचावी असे प्रतिपादन प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी केले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुश्मिति विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती समारंभात प्रा.डॉ.कदम बोलत होते.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप महाले ,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश दळे ,कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष शिरसागर , अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.चंद्रकला सोनवणे,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रवीण गायकर, प्रा.संदीप पठारे, प्रा.शुभम मुसमाडे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश जाधव यांनी केले.
