
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – श्रीरामनवमीच्या निमित्ताने राहाता तालुक्यातील जळगाव येथे सर्व धर्म समभाव असा संदेश देणाऱ्या ग्रामदैवत श्री.रोकडोबा महाराज व मासूम बाबा देवस्थान यात्रा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.शुक्रवार ४ एप्रिल पासून यात्राउत्सवास प्रारंभ होणार आहे.
यापार्श्वभूमीवर विविध धार्मिक व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्राउत्सव समितीकडून देण्यात आली आहे.(दि.४ एप्रिल) रात्री ७ ते १० यावेळत ग्रामदैवत मासूम बाबांची फटक्यांच्या आतिषबाजीत पंचक्रोशीतुन संदल मिरवणूक निघणार आहे. (दि.५ एप्रिल) रात्री ७ ते १० यावेळत श्री.रोकडोबा महाराज मंदिराच्या प्रांगनात भव्य दशाअवतारी सोंगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. (दि.६ एप्रिल) प्रभू श्री.राम भगवान यांच्या जन्म उत्सवानिमित्त सकाळी ९ ते १२ याळेत रोकडोबा महाराज मंदिरातून प्रभू श्री.राम यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीत समस्त ग्रामस्थ अतिशय भक्ती भावाने सहभागी होणार आहे जळगाव-चौधरी वस्ती भजनी मंडळाचे सहकार्य लाभणार आहे.याच दिवशी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात जंगी कुस्त्यांचा हगामा आयोजित केला जाणार असून कुस्त्याच्या हगाम्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातील व विविध जिल्ह्यातील मल्ल उपस्थित राहणार आहे.कुस्त्यांचा जंगी हगामा पाहायला मिळणार आहे.श्रीराम नवमीच्या पावन दिनी होणाऱ्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने समस्त जळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे यांचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या विधिवत धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांत सर्वांनी सहभाग घेवून यात्रा उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री. रोकडोबा महाराज व मासूम बाबा देवस्थानच्या यात्राउत्सव समिती कडून करण्यात आले आहे.
- जळगावची यात्रा सर्वधर्मीय ऐकतेचे प्रतीक..!
श्री.रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्राउत्सव सालाबादप्रमाणे श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर साजरा केला जातो.यात्रेत सर्वधर्मीय हिंदू- मुस्लिम एकता अनेक पिढ्या पासुन जपली जाते.यात्रेच्या पहिल्या दिवशी मासूम बाबा यांची पंचक्रोशीतुन संदल मिरवणूक निघते यात सर्व धर्मीय जणसमुदाय गुण्यागोविंद्याने एकत्र येतात.परिसरातील समस्त हिंदू-मुस्लिम बांधवांच्या हस्ते मासूम बाबांच्या दर्ग्यात चादर चढवण्यात येते.गाव समाज्याच्या उन्नतीसाठी प्रार्थना केली जाते ज्येष्ठांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेची सुरवात करण्यात येते मलिद्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात येते.
