
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता –जळगाव सामाजिक प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जळगावच्या माजी सरपंच सुमन वैराळ व छाया गायकवाड यांच्या हस्ते श्रीमती उज्वला काळे,सुनीता वाघ,आदी कर्तृत्ववान महिलांचा जागतिक महिलादिनी पुष्पगुच्छ शाल देवून विशेष गौरव करण्यात आला.
श्रीमती उज्वला काळे यांचे पती आण्णासाहेब काळे यांचे २००९ मध्ये निधन झाले. पती गेल्यानंतर श्रीमती काळे यांनी हिमतीने स्वतःच्या कुटुंबाचा गाडा हाकण्याची जबाबदारी स्वीकारली.पतीचे निधन होताच पुरुषांच्या बरोबरीने शेती करण्यास सुरुवात केली या दरम्यान त्यांना दीर-भाऊजई व पुतण्यांनी खुप सहकार्य केले.त्यांनी विविध अडचणी व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तब्बल १५ एकर शेती सांभाळली.परंतु; शेती करताना त्यांनी तिन्ही मुलांना मायेचा आधार देवून पदवीधर होण्यासाठी मोठे प्रोत्साहन दिले.
पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील शेती व्यवसाय यशस्वी करू शकते हे सर्वांना दाखवून दिले.वडीलांचे निधन झाल्यावरतिन्ही मुलांनी आईच्या कष्टाची जाण ठेवली मुलगा संदीप काळे यांनी मास्टर्स ऑफ मॅकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग तर मुली मेघा व वर्षा काळे या दोघींनी बॅचलर्स ऑफ आर्ट्स मधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.प्रा.संदीप अण्णासाहेब काळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली व उच्चशिक्षित झाले सध्याला ते ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुखपदी कार्यरत आहे.जळगाव सामाजिक प्रतिष्ठानचा सन्मान स्वीकारताना श्रीमती काळे म्हणाल्या की, पती गेल्यानंतर संपूर्ण शेतीचे धुरा सांभाळली या दरम्यान मुलांना शिक्षण करण्यासाठी प्रोत्साहन दिले मुलांनी उच्चशिक्षित होऊन यशस्वी होऊन दाखवत आमच्या कष्ठाचे चीज केले आहे या गोष्टीचा मनस्वी अभिमान वाटतो असे श्रीमती उज्वला काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी जळगाव सामाजिक प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचे कार्य उल्लेखनीय असून गावातील विधवा महिला तसेच कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांचा सन्मान करणे ही अभिमानास्पद बाब आहे.या गौरवामुळे महिलांना भविष्यात चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल असे मत ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश साखर कारखाण्याचे संचालक संपतराव चौधरी,जळगावचे सरपंच शिवाजीराव साबदे ग्रामस्थांनी अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे.या प्रसंगी बाळासाहेब चौधरी,रवींद्र चौधरी,प्रवीण चौधरी,अण्णासाहेब चौधरी,योगेश पंडित,राजेंद्र आदमाने,विजय चौधरी,निलेश सदाफळ,सागर वैराळ,रवींद्र वैराळ,शिवाजी काळे,चंद्रकांत वाघ,आदी उपस्थित होते.
जळगाव सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सर्वच महापुरुषांची जयंती साजरी केली जाते सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जातो गावात प्रतिष्ठानतर्फे विविध अभिनव उपक्रम राबवले जात आहे – बाळासाहेब चौधरी,जळगाव सामाजिक प्रतिष्ठान
वडिलांच्या निधनानंतर आईने धाडसाने संसार करत आम्हा भावंडांना अपरिमित प्रेम देवून शिस्तीने वाढवले उच्चशिक्षित करून ताकद-धैर्य दिले कोणतीही अडचण मोठी नाही अशी शिकवण दिली आई आमची आदर्श मार्गदर्शक आहे ती माझ्या पाठीशी उभी राहिल्यामुळे यशस्वी झालो आईचा सन्मान होणे ही माझ्यासाठी खूप आनंददायी बाब आहे – प्रा.संदीप काळे
