
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी राहुल राजळे
नेवासा – कायमस्वरूपी अवर्षग्रस्त असलेल्या शिंगवेतुकाई ता नेवासा येथे जानेवारी पासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून जनावरांना व माणसांना पिण्यासाठी जवळूनच जाणाऱ्या वांबोरी चारीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गेल्या आठवड्यात
शिंगवेतुकाई ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे नेवासा तहसीलदार व पाटबंधारे विभाग यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती व 10 मार्च पर्यत पाणी न सोडल्यास गावातच आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.पाणी न सुटल्याने सोमवार (दि.10) मार्च 2025 रोजी शिंगवेतुकाई ग्रामस्थ यांनी गावातील तुकाई माता मंदिरात आमरण उपोषणास सुरुवात केली आहेउ पोषणास मंडलअधिकारी विनायक गोरे,तलाठी भारत म्हसे यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.
परंतु गुरू दि 13 मार्च 2025 पर्यत जर वांबोरीचे पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चाचा इशारा शिंगवेतुकाई ग्रामस्थ यांनी दिला आहे.अहिल्यानगर, पाथर्डी,राहुरी तालुक्यातील गावांना वांबोरी चारीचे पाणी सुरू असताना नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई व इतर गावांवर पाण्याच्या बाबतीत का अन्याय केला जातो असा संतप्त सवाल उपोषणकर्ते व शिंगवेतुकाई ग्रामस्थांनी केला आहे.
उपोषणास शिवाजी होंडे,पांडुरंग होंडे,रामकृष्ण पवार,उद्धव पवार,ज्ञानदेव पवार,रामदास वाघ,भाऊसाहेब पवार,रघुनाथ पवार,प्रवीण गायकवाड,भाऊसाहेब पवार,पांडुरंग पवार,रेखा पवार,लहान मुले आदी ग्रामस्थ बसले आहेत शिंगवेतुकाईचे सरपंच दीपक पवार,माजी जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जलसंपदाचे उपविभागीय अभियंता विलास पाटील यांनी उपोषणास भेट दिली आहे.
