सामाजिक

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक कर्तृत्ववान महिला खंबीरपणे उभी आहे – सरपंच नारायणराव कदम

चितळी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माहिला दिन उत्साहात!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – आजच्या युगातील महिलांनी सुसंस्कारीत पिढी घडवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे सर्वस्थरावर उल्लेखनीय कामगिरी करत असून महिला प्रत्येक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करून यशाचे शिखर गाठत आहे याबरोबर कुटुंबाला आधार देत आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक कर्तृत्ववान महिला खंबीरपणे उभी असून.यासर्व कर्तृत्ववान महिलांचा-भगिनींचा सन्मान करणे सर्वांचे कर्तव्य आहे.असे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम यांनी व्यक्त केले.

राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी (दि.८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिलांच्या उपस्थितीत माहिलादिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रमातांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चितळीचे लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम होते.यावेळी चितळी परिसरातील समस्त कर्तृत्ववान महिलांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देवून यथोचित सन्मान करण्यात येवून गौरविण्यात आले.

चितळी ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित माहिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी चितळी परिसरातील समस्त महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून सहभाग नोंदवला.याप्रसंगी महिला सबलीकरण बालविवाह विधवा स्त्रियांच्या बद्दल असलेल्या रूढी परंपरा,बेटी बचाओ बेटी पढाओ,मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत जनजागृती करण्यात आली.चितळी परिसरात बालविवाह प्रतिबंध करण्याबाबत विशेष ठराव मंजूर करण्यात आला.

सरपंच कदम पुढे बोलताना म्हणाले,महिलांना पाठबळ देवून सक्षम करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे म्हणुन त्यांना प्रत्येक कार्यात सहकार्य करावे स्त्रीस मातेचा दर्जा प्राप्त झाला आहे म्हणुन स्त्रियांचा सन्मान करणे सर्वांचे कर्तव्य असून स्त्रियांना समाजात समान हक्क मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे स्त्री संपूर्ण जगाची जगतजननी आहे गावात सुरक्षित वातावरण निर्माण करणे काळाची गरज आहे समस्त माहिला-भगिनींचे संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे.शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाद्वारे गावात जनजागृती सुरु आहे स्त्री जन्माचे स्वागत करावे. मुलींचा जन्मदर वाढवणे ही काळाची गरज आहे बालविवाह होऊ न देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे.बालविवाहाचे परिणाम अत्यंत घातक असून भावी पिढी सुदृढ जन्माला येत नाही.म्हणून बालविवाह रोखण्यास प्रत्येक महिलेने जबाबदारीपूर्वक पुढाकार घ्यावा असे आवाहन सरपंच कदम यांनी केले.

 

यावेळी सरपंच नारायणराव कदम,उपसरपंच कविता पगारे, ग्रामपंचायत सदस्य ताराबाई गायकवाड,सोनाजी पगारे,संपत वाघ,अंगणवाडी सेविका मंदा वाबळे,संगीता शेळके,पूजा लावरे कल्पना मुसंडे, कल्पना पठारे,शकीला पठाण,सरला राहाणे, प्रमिला भालेराव,दिपाली साळुंखे,रंजना साळुंखे, सावित्री पवार,वनिता गायकवाड,उषा गायकवाड,मथुरा चौधरी,रूपाली वाघ, वर्षा भांगरे,स्वाती भोसले,स्वाती वाघ,ग्रामपंचायत कर्मचारी कैलास साळुंखे,संतोष वाघ,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक अहिरे विश्वास चोखर, सुजाता लांबटे, यांच्यासह चितळी परिसरातील समस्त महिला भगिनीं मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!