प्रशासकीय

कोपरगाव शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होणार !! नगरपालिकेने थंडीच्या दिवसांत आठ दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला असल्याचे समजले असून मात्र या सूचनेपासून जनता अजूनही अभिज्ञ आहे..

कोपरगाव प्रतिनिधी- अक्षय काळे 

 

कोपरगाव:- कोपरगाव नगरपालिकेने शहरातील जनतेची थट्टा चालवलेली दिसते एकीकडे थंडीचा कडाका वाढलेला असून सध्या तीन दिवसात पाणीपुरवठा केला जात आहे परंतु कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाने कुठलाही भोंगा (दवंडी) संपूर्ण शहरात फिरवलेला नसून गोरगरीब व सर्वसामान्य जनता ज्यांच्याकडे पाणी साठवण्याची क्षमता नाही त्यांचे आता मात्र हाल होणार आहे.

सर्वच नागरिक सोशल मीडियाचा वापर करीत नाही रोज आपले पोट मजुरी करून भरतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात नगरपालिका फक्त कर घेण्यातच धन्यता मानत आहे शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे आहे काही ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे पाण्याचा अपव्यय होतो हजारो लाखो लिटर पाणी वाया जाते परंतु नगरपालिकेला जनतेच्या या मूलभूत प्रश्नावर काही घेणे देणे नाही. 

“आता तर भर थंडीच्या दिवसात पाणी आठ दिवसाआड झाल्याचे परस्पर जनतेला कळत आहे तेव्हा नगरपालिकेने ठोस भूमिका घेऊन जनतेला पंधरा दिवसा पूर्वी ही माहिती देणे गरजेचे होते काही प्रभागात मोल मजुरी करणारे मजूर आहेत त्यांना त्या दिवसाचा खाडा करावा लागतो परिणामी आर्थिक झळ बसते ते पाणीपुरवठा बाबत ते अभिज्ञ आहे”

नगरपालिका केवळ हाय प्रोफेशनल सोसायटीचा विचार करते सध्या तरी परिस्थिती नगरपालिकेची आंधळं दळतं कुत्र पीठ खात अशीच म्हणावी लागेल शहरामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते हे पाणीपुरवठा बाबत काय भूमिका घेतात यावर कोपरगाव शहरातील सामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!