
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी- राहुल राजळे
सोनई (ता.२९) – श्री.शनिश्वर माध्यमिक विद्यालय सोनई (ता.नेवासा) येथील सन १९७८-७९ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थी एकत्र येऊन विद्यार्थी व शिक्षक मेळाव्याचे आयोजन तब्बल ४५ वर्षाचा कालखंडानंतर १० वी च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या आनंदात पार पाडला.
त्या मेळाव्याचे आयोजन माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक शंकरराव दरंदले, लक्ष्मण दरंदले यांनी केले होते. ४५ वर्षांनी सर्व एकत्र येऊन एक पूर्ण विद्यार्थी घडणारी पिढी एकत्र आल्याने या सर्वांनी आपापल्या आठवणीला उजाळा देत एकमेकासोबत मनसोक्त चर्चा केली. या काळातील शाळेच्या स्थापनेपासून सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने माजी विद्यार्थिनी शाळेचा या उपक्रमाचे कौतुक केले .या कार्यक्रमात प्रत्येकाच्या आठवणीचा सागर अथांग वाहिला. तसेच या कार्यक्रमाची आठवण म्हणून सर्वांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून ते वृक्ष वाढवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद लुटला आणि पुढील वर्षी एकत्र येण्याचा निर्धार यावेळी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक या शाळेच्या विद्यार्थिनी माधुरी चव्हाण यांनी केले.याप्रसंगी पाखरे, शोभा बंटीकर, माधुरी चव्हाण, शिक्षक साठे , माधुरी भळकट, माजी मुख्याध्यापक बिडे माजी मुख्याध्यापक एस.एच.दरंदले,माजी प्राचार्य उत्तमराव लोंढे , यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्यांनी या शाळेला जागा दिली असे पहिले विद्यार्थी अँड .सदाशिव राजहंस हे होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले ही शाळा अवघ्या ३ मुली,आणि २८ मुले अशी ३१ संख्येने सुरू झाली आणि कोणतेही काम दातृत्वाची भावना असावी लागते, माजी मुख्याध्यापक उत्तमराव लोंढे म्हणाले शिक्षकाची खरी श्रीमंती ती विद्यार्थी असते त्याचा मला आज जमलेल्या विद्यार्थ्यांमुळे अभिमान वाटला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक एस. बी. शेटे यांनी केले आभार राजगोपाल बंग यांनी मानले.
