
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-अक्षय काळे
कोपरगाव – कोपरगावातील मित्र फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवद्वार संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आज मित्र फाउंडेशनच्या ४६ व्या रक्तदान शिबीराच्या वेळी सांगितले.
यावेळी कोपरगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील सदस्य असलेले मित्र फाउंडेशनचे दोन हजार एक सालापासून तब्बल शेहेचाळीस वेळा रक्तदान शिबीर भरवले आहे यावे तब्बल २६८ जणांनी रक्तदान केले.
या प्रसंगी शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी सहभाग घेतला होता महत्त्वाचे म्हणजे महिलांनी सुद्धा उत्तम रित्या रक्तदानात सहभाग नोंदवला यावेळी काकासाहेब कोयटे, अमितदादा कोल्हे,राजेंद्र झावरे, अजितशेठ शिंगी,संदीपजी वर्पे,साहेबराव रोहम,सुनील देवकर,सचीन तांबे, दर्शनशेठ काले,नारायण अग्रवाल,श्री दत्ताजी काले, सुनीलजी गंगुले, विकासजी आढाव,,बाळासाहेब आढाव, सुनीलजी फंड, मंदारजी पहाडे, मुकुंदशेठ भुतडा,राजेंद्रे वाकचौरे,फकीरराव बोरणारे दौलत वाईकर,संदिप जाधव ,विरेंद्रजी बोरावके, मुकुंद मामा काळे, आकबर शेख, अंकुश वाघ, रोहितजी वाघ, दिपकजी वाजे,फकिरराव टेके,आविनाशजी पाठक, सागरजी शाह, सागरजी जाधव, राहुलजी सूर्यवंशी,कलवीर दडीयाल,श्री शेखरजी कोलते,रवी कथले,संतोष होन ,अनुप कातकडे, प्रशांत होण सहमित्र फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक,(निरव रवालिया ८८ वेळेस रक्तदान,प्रदीप निकुंभ ५५ वेळेस रक्तदान)यावेळी मंडळाचे सर्व सदस्यांनी प्रयत्न केल्याबद्दल मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी आभार मानले.
