प्रशासकीयमहाराष्ट्रशेती

महाराष्ट्र शासनाने रासायनिक ‘खते कंपनीच्या’ लिंकिंग धोरणा विरोधात समंजस भूमिका घ्यावी..नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची मागणी !! अन्यथा येत्या २६ जानेवारीला ‘खत परवाने शासन दरबारी जमा करणार’ 

'खते लिकिंग' च्या धोरणात शासनाने शिथिलता द्यावी सदरची लिंकिंग प्रक्रिया बंद करण्याची मागणी कृषी सेवा केंद्र संघटनेने केली असून याबाबत नेवासा तालुका कृषी अधिकारी श्री.धनंजय हिरवे यांना लेखी निवेदन सादर देण्यात आले आहे.'

 

‘खते लिकिंग च्या धोरणात शासनाने तातडीने लक्ष घालावे सदरची लिंकिंग प्रक्रिया तात्काळ बंद करण्याची मागणी नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी केली असून याबाबत नेवासा तालुका कृषी अधिकारी श्री.धनंजय हिरवे यांना लेखी निवेदन सादर देण्यात आले आहे.’

 

 

अहिल्यानगर:- नेवासा कृषी सेवा केंद्र चालक रासायनिक खते कंपनीचे लिंकिंग धोरणा विरोधाणा विरोधात एकवटले असून शासनाने लिंकिंग धोरणा विरोधात योग्य तो निर्णय न घेतल्यास येत्या २६ जानेवारीला ‘खत परवाने’ शासन दरबारी जमा करणार असल्याचे नेवासा तालुक्यातील  सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील व नेवासा तालुक्यातील रासायनिक खते विक्रेते असोशिएशन च्या वतीने याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री. धनंजय हिरवे यांना (ता.१९) निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हंटले आहे की नेवासा तालुक्यामध्ये रासयनिक खताच्या प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक ग्रेड सोबत काहीना काही प्रकारचे लिंकिंग केले जात असल्याचे दिसत आहे सध्या चालू असलेल्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या युरिया १८:४६:००, १०:२६:२६ आणि १५:१५:१५ या खतांसोबत सध्या गरज नसलेल्या अनावश्यक खते व औषधे याची विक्रेते बंधना सक्ती केली जात आहे, जर कोणी अनावश्यक खते व औषधे घेत नसतील तर त्या विक्रेत्यास आवश्यक असलेल्या रासायनिक खतांचा पुरवठा केला जात नाही.

त्या सोबतच सदरील आवश्यक असणाऱ्या खतांचें वाहतुक भाडेही विक्रेते बंधुकडुन वसुल केले जात आहे. त्यामुळे येणारी आवश्यक खते निर्धारीत किमंतीच्याही पुढे विक्रेते बंधुच्या दुकानात येऊन पडत आहेत. आणि वरुन लिकिंग घेत असल्यामुळे सध्या शेतकरी बंधना आवश्यक असलेल्या युरिया १८:४६:००, १०:२६:२६ आणी १५:१५:१५ या सारख्या खतांची निर्धारीत किंमतीमध्ये विक्री करुन रासायनिक खताचा व्यवसाय करणे खुप कठीण होत आहे. शेतकरी यांच्या भावाना अशी झाली आहे की, खते विक्रेते व दुकानदार आपल्या दुकानात विनाकारण अनावश्यक खते व औषधांचा साठा ठेवत आहे.

 

परंतु याची खरी वस्तुस्थिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती नाही. ही सर्व योजना कंपनीची असुन त्या योजने प्रमाने खते विक्रीत्यास राबवावी लागत आहे. तसे न केल्यास खते विक्री करणाऱ्याची आर्थिक फार मोठे नुकसान होत आहे. त्याबाबत रासायनिक खते कंपनीने व शासनाने शेतकरी यांच्यामध्ये जनजागृती करावे. तरी सरकारने सदर लिकिंग प्रकरणात स्वतः लक्ष घालुन आवश्यक असणारी सर्व खते विक्रेते बंधुना पोहोच होतील (FOR) व त्या खतांसोबत येणारे लिकिंग बंद करण्यासाठी प्रयत्न कराल ही माफक अपेक्षा नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची शेतकरी व शेतकरी बांधवानची या जाचातुन सुटका करावी असे म्हटले आहे.

नेवासा तालुका रासायनिक खते, बि-बियाने व किटकनाशके असोशिएशन नेवासा च्या वतीने सदरच्या खते लिकिंग बाबतच्या धोरणात शासनाने तातडीने लक्ष घालून सदरची लिंकिंग प्रक्रिया बंद न केल्यास नेवासा तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते आपले कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवुन रासायनिक खते कंपनीच्या लिकिंग धोरण विरोधात बंद पुकारणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

 

 

 

महाराष्ट्र शासनाने रासायनिक खते कंपनीचे लिंकिंग धोरणा विरोधात समंजस भूमिका घ्यावी.नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची मागणी !!अन्यथा येत्या २६ जानेवारीला ‘खत परवाने शासन दरबारी जमा करणार असल्याचे नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगतिले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!