बाभळेश्वरशेती

बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्य शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक  स्टॉल भेटी प्रसंगी केंद्रीय कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केंद्राचे कौतुक!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

लोणी:(ता.२४)- माजी पंतप्रधान चौधरी चरणसींग यांचे स्मृतीदिनानिमित भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत शेतकरी सन्मान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राच्या उपक्रमाचे केंद्रीय कृषि मंञी आणि मुख्यमंञ्यांनी कौतुक करत उपक्रमांची माहीती घेतली. 

या निमिताने केंद्रिय कृषि मंत्री ना. शिवराज सींग चौहान यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन वाणांचा जास्तीतजास्त अवलंब करून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न कसे वाढविता येईल यावर भर दिला पाहिजे असे सांगून रासयनिक औषधांच्या जास्त वापरामूळे जमिन दुषित होत आहे. यामुळे पुढच्या पिढीला आरोग्यदायी जमिन देण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्धा एकर / एक एकर या प्रमाणात सेंद्रिय पध्दतीने शेती करणे गरजेचे आहे. यासाठी बाभळेश्वरच्या कृ षि विज्ञान केंद्राचे कार्य महत्वपुर्ण ठरत आहे. 

या निमित्ताने आयोजित प्रदर्शनामध्ये कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरने सक्रिय सहभाग घेतला होता. यामध्ये राहुरी येथील सौ. निलीमा चिंचकर यांनी केशर उत्पादन बाबत स्टॉलद्वारे सविस्तर माहिती दिली. एरोफोनीक पध्दतीने त्यांनी केशर उत्पादन युनीट सुरु करून शाश्वत उत्पन्न घेत आहेत. सदर स्टॉलला केंद्रिय कृषि मंत्री मुख्यमंत्री ना. देवेद्रजी फडणवीस,उच्च तंञशिक्षण मंञी चंद्रकांत पाटील,आयसीएआरचे वरीष्ठ शास्ञज्ञ यांनी भेट देवून त्यांचे कार्याचे कौतुक केले. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राचे कार्य हे शेतकरी भिमुख आहे. या केंद्राचा गौरव करतानाच त्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून अहिल्यानगर मध्ये होत असलेल्या विविध विविध कामांचे कौतुक करतानाच बाभळेश्वरचे कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रभारी वरीष्ठ शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, पिक संरक्षण विभाग प्रमुख भरत दवंगे, उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. विलास घुले, मृदविज्ञान विभाग प्रमुख, शांताराम सोनवणे आणि गृहविभागाच्या सौ. सज्जला लांडगे, कैलास लोंढे उपस्थित होते. 

 

 

केंद्रीय कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमाची माहिती त्यांच्या स्टॉलवर जाणून घेत असताना मंत्री विखे पाटील हे कृषी क्षेत्रात करत असलेल्या कामातही कौतुक केले. माती परीक्षण यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत असल्यामुळे तंत्रज्ञान प्रसारामध्ये या केंद्राचा वाटा महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी केंद्रीय कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!