धार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गावागावात प्रत्येक हिंदूंमध्ये एकी राहावी हाच राष्ट्रीय श्रीराम संघाचा मुख्य उद्देश – सागर बेग

माळवडगाव येथे राष्ट्रीय श्रीराम संघ शाखेचे उद्घाटन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर – वक्फ बोर्डाच्या विरोधात महाराष्ट्रातून पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघाची शाखा सुरू करण्यामागील हेतू हा राजकीय मुळीच नसून गावागावात प्रत्येक हिंदूंमध्ये एकी राहावी हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर हिंदूंनी एकजुटीने आवाज उठवावा हा मुख्य उद्देश त्यामागील असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केले आहे.

 

विधानसभा निवडणुकीनंतर गाव तेथे शाखा सुरू करण्याची सागर बेग यांनी केलेल्या घोषणेनुसार माळवडगाव याठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघ शाखेचे उद्घाटन पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक नानासाहेब आसने व बाळासाहेब हुरुळे यांच्या हस्ते शाखेच्या फलकाची फित कापून करण्यात आले त्याप्रसंगी बेग हे बोलत होते.

 

गावातील हनुमान मंदिर सभा मंडपात झालेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना सागर बेग पुढे म्हणाले की,गावागावात अनेक राजकीय पक्ष असतात बहुतेक पक्षांचा सेक्युलरी किडा हा मतांसाठी वळवळ करत असतो.त्यामुळे हिंदूंच्या हिताकडे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष केले जाते.हिंदूंवर अन्याय झाल्यास गावातले वाद गावातच मिटवावेत या काँग्रेसी युक्तीने हिंदूंच्या वादावर पडदा टाकला जातो या गांधीवादी अहिंसात्मक प्रवृत्तीमुळे हिंदूंवरील अन्याय तर वाढलेच पण त्यामुळे जिहादी ताकद देखील वाढली याचे कोणाला भान राहिलेले नाही.हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आवाज उठवता यावा हिंदूंनी एकीने सनातनी विचार शेवटच्या हिंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाची स्थापना गावोगावी सुरू करण्याचा मानस असल्याचे बेग यांनी म्हंटले आहे.वक्फ बोर्डाच्या विरोधात संसदेत पास झालेले बिल रद्द करावे या मागणीसाठी जिहाद्यांनी राज्यात काही दंगली घडवल्या आहेत पण त्या बिलाच्या समर्थनार्थ एकही हिंदू रस्त्यावर उतरला नाही हे खूप मोठे दुर्दव्य आहे.वक्फ कायदा रद्द करा ही मागणी महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय श्रीराम संघाने सोनई येथील जाहीर धर्मसभेतून केली होती.अशी मागणी करत असताना अनेक हिंदूंना वक्फ बोर्ड कायदा काय आहे हेच माहित नव्हते ही खूप मोठी शोकांतिका असल्याचे बेग यांनी म्हंटले आहे.मुठेवडगाव पासून सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्याप्रसंगी माळवडगाव येथील कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी पोहोचल्यावर फटाक्यांच्या आतिषबाजीत सागर बेग व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक नानासाहेब आसने,बाळासाहेब हुरुळे दिलीप हुरुळे,संजय खताळ, बाळासाहेब खताळ,सदाशिव आसने, दादासाहेब आसने,यांच्यासह उपसरपंच शाम आसने, डॉ. गोकुळ मुठे, रामेश्वर मुठे,रावसाहेब आढाव,नाथा मामा दळे,अशोक आसने देवराज,आसने मारुती,जंगले पत्रकार रवी आसने, पत्रकार संदीप आसने,पत्रकार मयूर पिंपळे,शाखा अध्यक्ष रवींद्र आसने,उपाध्यक्ष मिनीनाथ थोरात, सचिव चेतन आसने खजिनदार राहुल कावरे,अरुण आसने,दीपक आसने आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!