
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथील जय बजरंग दल प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवार (दि.११) एप्रिल रोजी श्री. हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने ग्रामदैवत श्री.रोकडोबा महाराज मंदिरात सकाळी ६ वाजता श्री हनुमान यांच्या मूर्तीला अभिषेक घातला जाणार आहे धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ठीक ७ वाजता समस्त भाविक भक्तांना बजरंग दल प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी जळगाव पंचक्रोशीतील समस्त हनुमान भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव पंचक्रोशीतील जय बजरंग दल प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
