
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-वैभव ताजणे
संगमनेर:- तालुक्यातील उंबरीबाळापुर येथील पंकज अरूण काबंळे (वय २२ वर्ष) शेण खत ट्रॉक्टर मध्ये टाकत असतांना विजेचा शॉक लागुन मुत्यु झाला असुन २६ दिवसापासुन पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने दोषी ग्रामसेवक संग्राम सयाजी चांडे, सरपंच अर्चना सुभाष भुसाळ व संजय ज्ञानदेव शिकरे यांना वाचवण्याचा आरोप मयत पंकज कांबळे चे चुलते शरद कांबळे यांनी केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि २८ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ५ वा ३० मि पंकज अरूण कांबळे हा भाऊराव बर्डे व आकाश गिते यांच्या बरोबर संजय ज्ञानदेव शिखरे रा प्रवरा डाव्या कलव्या जवळ ,उंबरी बाळापुर तालुका संगमनेर येथे शेणखत भरण्यासाठी गेला होता. ग्रामपंचायत उंबरीबाळापुर यांच्या दलित वस्ती अंतर्गत संजय शिकरे यांच्या घरा समोरील रस्त्यालगत ग्रामपंचायत चे आठ इलेक्ट्रीकल पोल लाईट आहे. घरासमोर शेणखताचा उकाडा होता
साधारणता ४ ते ५ फुंट उंचीवर लोबलेल्या स्ट्रिट लाईट त्यावरून गेलेली आहे असलेले होते.तर काही ठिकाणी तीच वायर ही झाडाला बांधलेली दिसली. सदर घटनेची माहिती कळताच शरद कांबळे व अरूण कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी घटनास्थळी पोहचल्यावर बेशुद्द पंकज अरूण कांबळे याला प्राथमिक उपचारासाठी आश्वी खुर्द ता संगमनेर येथील डॉ गणेश गायकवाड यांच्याकडे घेऊन गेले पुढील उपचारासाठी तसेच तपासणीसाठी लोणी ता राहाता येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या दवाखाण्यात घेऊन आलो असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की, पंकज हा उपचारापुर्वीच मयत झाला असुन तिथे पोस्ट मार्टम करून तसेच पोलिस पंचनामे झाल्यावर २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मयत पंकज कांबळे यांचा अंत्यविधी झाला.
(दि २८) नोव्हेंबर सायंकाळी ५ वा ३० मि झालेल्या घटनेस उंबरीबाळापुर ग्रामपंचायच चे ग्रामसेवक संग्राम सयाची चांडे राहणार चांडेवाडी, तालुका राहाता, सरपंच अर्चना सुभाष भुसाळ तसेच शेण खताचे मालक संजय ज्ञानदेव शिखरे ( दोघे ही राहणार उंबरीबाळापुर ,तालुका संगमनेर) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस २०२३) कलम १०६ (१) व (बी एन एस २०२३) कलम ३(५) अपघात करणे तसेच खुन करण्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल प्रसाद सोनवणे करत आहे.
या घटनांचा घटनाक्रम बघता स्थानिक पोलीस प्रशासन हे आरोपी तांब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार की केवळ शासकीय सोपसकार उरकणार या कडे लोकांचे लक्ष लागुन राहिले आहे. लवकरच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर घटनेचे कथन करणार असल्याचे मयत पंकज चे वडिल अरूण कांबळे यांनी सांगितले.
