धार्मिकमहाराष्ट्र

हलाल प्रमाणपत्र हद्दपार करण्यासाठी हिंदूंनी आपली वज्रमूठ आवळावी- धर्मरक्षक सागरभैय्या बेग

नाशिक जिल्ह्यातील बसंत पिंपळगाव याठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मसभेचे आयोजन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर -पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या हलाल प्रमाणीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करून आपण अप्रत्यक्षपणे लवजीहादला पाठबळ देत आलेलो आहोत यामध्यमातून जमाते उलेमा हिंद ही मुस्लिम संघटना वर्षाला ऐंशी लाख कोटी रुपये कमावते तो आपलाच पैसा आपल्याच हिंदू मुलींना लवजीहाद मध्ये अडकवण्यासाठी व हिंदू विरोधी,देशविरोधी कारवयात वापरला जातो आता त्या हलाल प्रमाणित वस्तूंविरोधात हिंदूंनी एकजूट झालं पाहिजे ज्याप्रमाणे जुलमी वक्फ बोर्डा विरोधात आपणच सर्वात प्रथम आवाज महाराष्ट्रातून उठवला तेंव्हा कुठे शासनाने याविरोधात पाऊले उचलली आता हलाल प्रमाणपत्र हद्दपार करण्यासाठी हिंदूंनी आपली वज्रमूठ आवळावी असे आवाहन धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांनी केले आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील बसंत पिंपळगाव याठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत प्रमुख वक्तेपदावरून ते बोलत होते,आपल्या घणाघाती अर्ध्या तास चाललेल्या भाषणात ते पुढे म्हणाले की,आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात मदरसा छाप लोकांना काँग्रेसने जाणूनबुजून शिक्षणमंत्रीपद दिले.ज्यांचे जन्म मक्का मदिन्यात झाले ते जर देशाचे शिक्षणमंत्री होत असतील तर आपल्या इतिहासात किती मोठ्या प्रमाणात छेडछाडी झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा याच शिक्षण मंत्र्यांच्या काळात अकबर महान झाला व छत्रपतींच्या सैन्यात मुस्लिम मावळे घुसवण्यात आले.१९४७ मध्ये अवघे तीन हजाराच्या आसपास मदरसे होते तर गुरुकुल लाखाच्या घरात पण आज परिस्थिती उलट झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राम्हणांचा म्हणून या देशप्रेमी संघटनेची अवहेलना केली जाते ते अत्यंत चुकीचे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आज लाखो स्वयंसेवक हे ब्राम्हणेतर आहेत व धर्मकार्यात कार्यरत आहेत याचा विचार प्रत्येक हिंदूंनी केला पाहिजे.तुरुंगातील मुस्लिम कैदी रामदेव बाबांचे पतंजली उत्पादन हे गोमूत्र मिश्रीत असल्याची खोटी वावडी उठवून नाकारत आहेत आणि त्याचा परिणाम बाहेरही पतंजली व हल्दीरामच्या उत्पादनाच्या विक्रीवर झाला जमाते उलेमा हिंद या संघटनेचा या कंपन्यांवर इतका मोठा वाईट प्रभाव पडला की, पतंजली चे जवळपास साठ प्रकारचे उत्पादन आज हालाला प्रमाणित होऊन विक्री केले जात आहेत.या मधून जमाते उलेमा हिंद ही संघटना ऐंशी लाख कोटी रुपये वर्षाला कमावते ही चिंतेची बाब असून त्यावर आवाज उठवणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 

भारतातील अनेक कंपन्या या हलाल प्रमाणपत्राच्या बळी गेलेल्या आहेत २०१३ अगोदर हलाल प्रमाणपत्राची भीती कंपन्यांमध्ये एव्हढी नव्हती परंतु २०१३ नंतर जगातील मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येऊन मलेशियामधून भारतात हालालाची व्याप्ती एव्हडी वाढली की आज ऐंशी लाख कोटी रुपये जमाते उलेमा हिंद ही संघटना पैसा कमवत आहे त्या संघटनेवर शासनाने बंदी घातली पाहिजे अशी मागणी करून ते म्हणाले की,जमाते उलेमाच्या दबावाला बळी पडलेल्या प्रत्येक

कंपन्यांमध्ये हलाल प्रमाणपत्र निरीक्षक म्हणून दोन मुसलमानांना कंपन्या लाखो रुपये पगार देऊन पोसतात हा सर्व अर्थव्यवस्था पोखरणारा व हिंदू धर्म बाटवणारा हलाल प्रकार रद्द झाला पाहिजे त्यासाठी लढा देण्याची गरजही सागर भैय्या बेग यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!