प्रशासकीयमहाराष्ट्रशेती

सर्व शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबरपर्यंत ई-पिक पाहणी करावी; – विठ्ठलराव शेळके

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तातडीने ई-पिक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे. अनेक शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी अद्याप राहिली असल्याने संघटनेच्या निवेदनानंतर सरकारने मुदतवाढ देत ३ ऑक्टोबर २०२५पर्यंतचा अवधी दिला आहे.

 

यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिके उध्वस्त झाली असून पंचनामे सुरू आहेत. मात्र ई-पिक पाहणी न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पिक विमा तसेच कृषी विभागाच्या कोणत्याही योजना, सवलती वा अनुदानाचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.म्हणूनच उर्वरित शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबरच्या आत ई-पिक पाहणी करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!