
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव परिसरातील शेतकऱ्यांचे दि. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन जळगाव येथील तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आधारकार्ड झेरॉक्स, आधार लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स, आधार लिंक मोबाईल क्रमांक तसेच नोट कॅम अॅपमधून काढलेले अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे फोटो (नाव, गट क्रमांक व पिकाचे नाव स्पष्ट दिसेल असे) ही कागदपत्रे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीत तलाठी कार्यालय, जळगाव येथे जमा करावीत. पिकांचे फोटो प्रिंट करण्याची आवश्यकता नसून ते थेट व्हॉट्सअॅप क्रमांक 9922155811 किंवा 7888181998 वर पाठवावेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शेतकरी बांधवांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.




