
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – शालेय जीवनात वाचन अभिरुची वृद्धिंगत होणे गरजेचे आहे पुस्तके माणसाला घडवतात आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्याकरता पुस्तकांचा सहवास साह्यभूत ठरतो त्यामुळे पुस्तक वाचन आवश्यक आहे गतकाळातील उत्तुंग व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्याची संधी पुस्तक वाचनामुळे मिळते म्हणून पाठ्यपुस्तकांबरोबर चरित्र कथा कादंबरी आत्मचरित्र प्रेरणादायी पुस्तकांची वाचन करणे अपेक्षित आहे वाचन अभिरुची भविष्यात दिशादर्शक ठरते असे प्रतिपादन लोणी पायरेन्सचे सचिव डॉ.निलेश बनकर यांनी केले.
विकासभीमुख आणि समाजहिताची जण असणाऱ्या नेतृत्वाचा अर्थात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होत असलेल्या “वाढदिवस सप्ताह” उपक्रमांतर्गत डॉ.विठ्ठलराव विखे पाटील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय बाभळेश्वर येथील दृष्टीहीन व विशेष विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पुस्तके व इतर साहित्य दान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते पायरेन्स आय बी एम एच चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी, डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब पागिरे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
पुस्तके वाटप , खेळाचे साहित्य, संगणक वाटप,या मोहिमेमुळे केवळ परिसरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनातही सामाजिक जबाबदारीची बीजे रोवली गेली. माजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील पायरेन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पायरेन्सच्या वतीने समाज हितार्थ अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात.सामाजिक भान, आणि दातृत्व दृष्टिकोनातून पायरेन्स संस्थेचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे जागरूक समाज हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे मत सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.डॉ सतिश बिडगर यांच्या समन्वयाने पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ. विठ्ठलराव विखे पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय बाबळेश्वर येथील शिक्षक व कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
