कृषी विज्ञान केंद्र

वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा निसर्गाचा हिरवा ठेवा आहे आणि तो प्रत्येकाने जपावा – डॉ.सुप्रियाताई ढोकणे पाटील

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे जगा आणि जगू द्या हे तत्व निसर्गाच्या दृष्टीने महत्वपुर्ण आहे. बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृक्ष संवर्धनाच्या चळवळीला पुढे घेवून जाण्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविण्याच्या केलेल्या आवाहानाला पाठबळ म्हणून मंत्री विखे पाटील यांनी आपला वाढदिवस हा प्रवरा संकुलासह सर्व गावे, वाड्या वस्त्यांमध्ये वृपक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण उपक्रम राबविण्याचे सुचित केले होते. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा निसर्गाचा हिरवा ठेवा आहे आणि तो प्रत्येकाने जपण्याचे काम करावे असे प्रतिपादन पायरेन्सच्या विश्वस्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांनी केले. 

 

 पायरेन्सचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त “वाढदिवस सप्ताह” साजरा होत आहे. या कालावधीत समाजकल्याण, पर्यावरण,आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या उपक्रमाचा प्रारंभ डॉ. सुप्रियाताई ढोकणे विखे पाटील यांनी केला. 

 

    

 यावेळी बोलतांना डाॅ.ढोकणे पाटील म्हणाल्या“ग्रीन लिगसी डे” अर्थात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेने झाली पर्यावरण रक्षण ही काळाची गरज, वृक्षारोपण हा भविष्यासाठी दिला जाणारा हिरवा ठेवा आहे. पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे अनेक समस्या ह्या वाढल्या आहेत. शेती निसर्ग त्याचबरोबर मनुष्यावर ही परिणाम जाणवत आहे. यासाठी पर्यावरण जनजागृती ही सर्वाची जबाबदारी आहे. त्यांच्या उपस्थितीत परिसरात विविध प्रजातींच्या सुमारे १०० हून अधिक औषधी वनस्पती लागवड करण्यात आली.  

 

कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे सचिव व संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे सप्ताहभर दररोज एक विशेष सामाजिक उपक्रम राबविला जाणार असून त्यात कॅम्पस स्वच्छता मोहिम, आरोग्य तपासणी शिबिरे, साहित्य दान, योग दिन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे अशी माहिती पायरेन्स आयबीएमए चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी दिली. आयबीएमए आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथील शिक्षक, कर्मचारी,विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!