
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – सध्या बदलत्या हवामानामुळे व इतर बाबींमुळे शेती व्यवसायात मोठे आव्हान निर्माण झाले असून हे आव्हान कमी करण्यास काटेकोर शेती पद्धतची मदत होणार असून या पद्धतीमुळे कमी जागेत, कमी पाण्यात व कमी खर्चात दर्जेदार कृषी उत्पादन मिळते.त्यामुळे शेती व्यवसायात नफा मिळवू शकेल असे प्रतिपादन प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी केले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेने मौजे कोल्हेवाडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी चर्चासत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. अलका दिघे होत्या.यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.दिलीप महाले, सरपंच सौ सुवर्णा दिघे , उपसरपंच जालिंदर दिघे, माजी उपसरपंच मोहन वामन, जनसेवा मंडळ अध्यक्ष अमोल दिघे, राजेंद्र दिघे, इंद्रभान दिघे, श्रीमती कल्याणी कोल्हे,आकाश वाळुंज, सतीश वाळुंज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्रा. सुदाम वर्पे यांनी भाजीपाला पिकांमधील विविध कीड व रोग तसेच त्यांचे नियंत्रण याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली . सहायक कृषी अधिकारी श्रीमती अर्चना नवले यांनी कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश जाधव यांनी केले. सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे डॉ. विक्रम अनाप , प्रा. अक्षया वाळुंज तसेच कृषीदुत इंद्रजीत दिघे, सार्थक दिघे, कार्तिक म्हसे, प्रतीक गोसावी व सौरभ पगार आदींनी प्रयत्न केले.
