Uncategorized

दहावीच्या निकालात प्रवरा ठरली अव्वल; इंग्रजी माध्यमाच्या शाळासह दहा शाळा ठरल्या शंभर नंबरी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्टेट बोर्डचा आठ शाळा शंभर नंबरी ठरल्या. संस्था पातळीवर प्रवरा कन्या विद्या मंदिर,लोणी ची ज्ञानेश्वरी सखाराम भोसले ही ९७.८० टक्के गुण मिळवत प्रथम, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल,लोणी ची ऋतुजा सुरेशसिंग लकवाल ही ९७.४० टक्के गुण मिळवत द्वितीय तर प्रवरा पब्लिक स्कूल,प्रवरानगर येथील यश विजय खाडे याने ९६.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळाला. संस्थेचा निकाल ९३.३७ टक्के लागलाआहे. असून सेट्रल बोर्डाचा निकाल आहे शंभर टक्के लागला असून यामध्ये प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल,प्रवरानगर येथील आर्यन मल्हारी सोनार हा ९४.८० टक्के गुण मिळवत प्रथम, साई राजेश गुंजाळ हा ९४.६० टक्के गुण मिळवत द्वितीय तर आनंदी नितीन भडांगे ही ९४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला अशी माहिती संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी दिली. 

 

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या ४१ शाळांनी आपले गुणवत्ता कायम ठेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देण्याचे काम केले. आहे स्टेट बोर्ड बोर्ड मध्ये संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी, प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर, पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कूल लोणी, प्रवरा माध्यमिक विद्यालय चिंचपूर, उंबरी बाळापूर, रामपूर, कासारवाडी या आठ शाळांचा निकाल शंभर नंबरी लागला आहे.तर सेंट्रल बोर्डाच्या निकालात प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कुल प्रवरानगर आणि प्रवरा हायस्कूल कोल्हार बुद्रुक या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. स्टेट बोर्डाची १,८७० पैकी १,७४६ विद्यार्थी पास झाले तर सेंट्रल बोर्डाची १३६ पैकी १३६ विद्यार्थी पास झाले.  

 

ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम शालेय पातळीवरती सुरू असतात. यामुळे शालेय विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न घडत आहे. यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध उपक्रम हे सुरू असतात. विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया म्हणून इयत्ता दहावी आणि बारावी कडे बघितले जाते. आज प्रवरेची गुणवत्ता ही वाढत आहे आणि या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा जागतिक पातळीवरती पोहोचवण्यासाठी सर्व गुण संपन्न शिक्षणावर प्रवरेचा भर आहे.  

 

यशस्वी विद्यार्थिनींचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,डाॅ.राजेंद्र विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिकचे संचालक डॉ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!