प्रवरा शिक्षण संस्था

उन्हाळी शिबीरांतून सक्षम आणि उपक्रशिल शिक्षण मिळते- सौ.शालीनीताई विखे पाटील

प्रवरेच्या निवासी उन्हाळी शिबीरात राज्यभरातील ११६ विद्यार्थ्याचा सहभाग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी –विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच सुट्टीचा उपयोग त्यांचे छंद आणि विविध कला गुणांना वाव मिळावा आणि त्यांना आवडत्या गोष्टींमध्ये करिअर करता यावे यासाठी उन्हाळी शिबिर हे महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रवरेच्या माध्यमातून आयोजित होणारे उन्हाळी शिबिर हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. 

 

 लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित प्रवरा निवासी उन्हाळी शिबिर २०२५ च्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील होत्या. यावेळी सहसचिव भारत घोगरे, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे प्राचार्य डॉ. महेश खर्डे,प्रा.विजय आहेर, शिबिराचे समन्वयक राजेश माघाडे, हिमालय वदक , मयूर कदम, नीलिमा पाटील, ज्ञानेश्वर पाठक, सैनिकी स्कूलचे प्राचार्य शंकर रिंगे , केतन तलोरे, आदींसह पालक विद्यार्थी उपस्थित होते. 

 

यावेळी बोलताना सौ. विखे पाटील म्हणाल्या , प्रवरेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना संधी दिली जाते. यासाठी वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या पातळीवरती सुरू असतात. उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान मिळावे. त्याचबरोबर त्यांना सुट्टी मध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकता यावे हा उद्देश ठेऊन प्रवरेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. या माध्यमातून राज्यभरातील मुले ही या शिबिरामध्ये सहभागी होत असतात. घरापासून दूर असले तरी या मुलांची सर्व काळजी प्रवरेच्या माध्यमातून घेतले जाते. प्रवरेने उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून आपले एक वेगळेपण कायमच जपले आहे असे सांगतानाच पालकांनी प्रवेशाबाबत जागृत राहणे गरजेचे आहेत आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा यासाठी आपण वेळेत संपर्क साधावा असे सांगतानाच नवीन तंत्रज्ञानातून शिक्षण आज विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये मैत्री ही वाढीस लागते. त्याचबरोबर त्यांना आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये करिअर करता येते. 

 

 संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, उन्हाळी शिबिरातून प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचा काम शिबिराच्या आयोजन समितीने केले आहे. पालकांचे मोठे सहकार्य मिळाले. भविष्यामध्ये अशी शिबीरे ही होतच राहणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीने त्याला संधी देण्याबरोबरच या शिबिराच्या माध्यमातून एक सक्षम विद्यार्थी उभा करण्याचे काम झाले आहे. शिबिरामध्ये राज्यभरातून ११६ विद्यार्थीचा सहभागी झाले ही बाब गौरवपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

 

दहा दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जलतरण, अश्व परेड, रायफल शूटिंग, योगा, संगीत, आर्टआणि गॅलरी, प्रिंटिंग, कुंभारकाम, चिञकला, श्लोक, सायन्स आणि विज्ञान, पाक कला,टाकाऊ पासून टिकाऊ, लेझीम याशिवाय थोरा मोठ्यांचे कार्य याची ओळख करून देत असतानाच महिला योद्धा सन्मान ही संकल्पना शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना विविध विषयांची परिपुर्ण माहीती दिली.यावेळी सहभागी विद्यार्थी आयुष आरोही,प्रणिती नवले आणि पालक प्रतिनिधी शितल कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश माघाडे यांनी उपक्रमांची माहीती दिली. कायक्रमाचे सुञसंचालन निलिमा पाठक यांनी तर आभार सौ.लिलावती सरोदे यांनी मानले.

 

  

 वयोगट ६ ते १४ वर्षाच्या मुलांसाठी आयोतित या उन्हाळी शिबिरांतून सहकारी पंढरीतून या मुलांना मोठी अशी संस्काररांची शिदोंरीसह मोबाईल शिवाय ही सुट्टीत खुप काही करता येते शिवाय दहा दिवसांच्या मैञीपुर्ण आणि आनंदी शिक्षणांतून आपला पाल्य हा खुप हुशार आहे हेच सहभागी मुलांनी त्पांच्यासाठी राबविलेल्या उपक्रमातून दाखवून दिले. 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!