
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील चितळी स्टेशन परिसरातील अक्षदा कृषी जीवन या दुकानाला ३ ते ४ मे २०२५ दरम्यान रात्रीच्या वेळी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली यात दुकानातील रासायनिक खते, विद्राव्य खते, कीटकनाशके व बुरशीनाशके खतांचा मोठा साठा जळून खाक झाला असून पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला असून या जळीतात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.याप्रकरणी बापूसाहेब बन्सी चौधरी यांनी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे.या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे करत आहे.
घटनेची सविस्तर हकीकत अशी आहे की, बापूसाहेब बन्सी चौधरी हे चितळी स्टेशन येथे अक्षदा कृषी जीवन या नावाने कृषी सेवा दुकान चालवतात. दररोजप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर,रात्री उशिरा ३ मे ते ४ मे च्या दरम्यान दुकानात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली.सकाळी ४ मे रोजी ६ वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना दुकानातुन धुराचे लोट असल्याचे दिसलें यावेळी ही बाब तात्काळ बापूसाहेब चौधरी यांना दूरध्वनी वरून संपर्क करून सांगितली.
यावेळी बापूसाहेब चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दुकानातील बहुतेक रासायनिक व खते साठा भीषण आगीच्या भक्षस्थानी येवून खाक होवून पडला होता. अक्षदा कृषी जीवन दुकानात विक्रीसाठी ठेवलेले रासायनिक खते, विद्राव्य खते, कीटकनाशके व बुरशीनाशके सारख्या महागड्या महत्वाच्या कृषी औषधांबरोबरच इतर खते व खतांच्या गोण्या पूर्णतः जळून नष्ट झाल्या आहेत.यामुळे बापूसाहेब चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकऱ्यांच्या कृषी इनपुटसाठी महत्त्वाच्या असलेल्या या दुकानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘आग लागल्याने दुकानातील कृषी रसायनांचा मोठा साठा आणि रासायनिक खते, विद्राव्य खते, कीटकनाशके व बुरशीनाशके खते पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सेवा पुरवण्यात अडचणी येतील. हे नुकसान आम्हाला आर्थिक दृष्ट्या मोठा धक्का देणारे आहे.”- बापूसाहेब बन्सी चौधरी, कृषी सेवा केंद्र चालक
—
