महाराष्ट्रराजकीय

मुंबई येथे अकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारस हक्कासाठी निवेदन; मंत्री राधाकृष्ण विखेंकडून आठ दिवसात निर्णयाचे आश्वासन

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

मुंबई – शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकारी पडीत शेतकरी बंधू व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई येथे मंत्रालयात भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी ९ गावांतील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करून वारसांना तातडीने जमीन देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, महसूल सचिव व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

 

या निवेदनावर प्रतिसाद देताना महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठ दिवसांच्या आत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे ठाम आश्वासन शेतकरी बांधवांना दिले.त्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निवेदन दिले. त्यांनी देखील या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.या शिष्टमंडळात सचिन वेताळ, सुनील आसने, बाबासाहेब वेताळ, सागर गीथे, गोरक्षनाथ वेताळ आणि बाळासाहेब आसने हे शेतकरी सहभागी झाले होते. या दौऱ्याबाबतची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!