
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – शतायुषी जीवनासाठी आहार व्यायाम व ध्यानधारणा संतुलित जीवनशैलीचा वापर आरोग्यासाठी उपयुक्त आहे. बालकांपासून तरुण आबाल वृद्धांपर्यंत रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आरोग्य प्रति जागरूकता महत्त्वाची आहे अनेक आजारांवर आयुर्वेद उपचार प्रभावी ठरत आहे रोगाच्या उच्चाटनासाठी आयुर्वेद’ ही चिकित्सा पद्धतीचा वापर आवश्यक आहे यासाठी पायरेन्सचा येथील बाह्य रुग्ण विभाग महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगत विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील कार्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन गुरुराष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आयुष्य मंत्रालय महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन श्रीजी आयुर्वेद श्रीरामपूर अध्यक्ष डॉ. सतीश भट्टड यांनी केले.
पायरेन्सच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चंद्रापूर (लोणी) , यांच्या वतीने खडके वाके येथे आयुर्वेद बाह्य रुग्ण विभाग ओपीडी औषध व पंचक्रम विभागाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव डाॅ.निलेश बनकर, सरपंच संगीता मुरादे , सचिन मुरादे ,जयश्री मुरादे, जालिंदर मुरादे, बाळासाहेब लावरे, मनीषा लावरे, आकाश आगळे, डॉ महेंद्र बोर्डे डॉ बाळासाहेब पागिरे डॉ. नालकर डॉ पठारे डॉ. प्रकाश म्हस्के, डॉ. वैष्णवी निर्मळ, उपस्थित होते.
यावेळी सचिन मुरादे म्हणाले,ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम होण्यासाठी जलसंपदा मंञी ना, राधाकृष्ण विखे पाटील,. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील सदैव तत्पर आहेत राहता तालुक्यातील ग्रामीणभागातील खडके वाके हे आदर्श गाव असून गावाची वाटचाल चालूही ही विकासाकडे सुरु आहे.डॉ. सुप्रियाताई ढोकणे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरासमूहातर्फे या नवीन केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना पारंपरिक आयुर्वेद उपचारांचा लाभ सहज मिळू शकणार आहे. तर डाॅ.बनकर यांनी या बाह्य रुग्ण केंद्रात आयुर्वेदिक औषधे, विविध उपचार पद्धती आणि पंचकर्म थेरपी उपलब्ध आहेत विविध आजारावर आयुर्वेद पंचकर्म उपचाराद्वारे प्रभावी उपचार होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार महेंद्र खर्डे यांनी मानले.
