
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-वैभव ताजणे
आश्वी- स्त्री शिक्षणासाठी समनता व सत्यासाठी देह झिजवणाऱे थोर समाज सुधारक क्रांतीशुर्य़ महात्मा जोतीबा फुले त्याच प्रमाणे शिक्षणापासुन वंचीत असलेल्या स्त्रीयासाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जंयतीच्या निमित्ताने २०२५ वर्षातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील उंबरीबाळापुर येथे १९४ व्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावता महाराज मंदिर सभागृहात आयोजित जंयती प्रसंगी सुरेश थोरात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ गिते होते.यावेळी सरुनाथ उंबरकर, अशिष शेळके,रामभाऊ भुसाळ, शौलाजा नावंदर, पोलिस पाटील वैशाली मैड, कुमारी अंजली पावबाके तसेच प्राचार्य त्रिभुवन यांची भाषणे झाले.यावेळी सावित्रीच्या लेकी स्वारा दिघे तसेच मयुरी माळी यांना सन्मानीत करण्यात आले.
या प्रसंगी कार्यध्याक्ष हरीभाऊ माळवदे, उपाध्यक्ष गणपत शिंदे,दिपक चौधरी,सरपंच अर्चाना भुसाळ, उपसरपंच किसन खेमनर, ग्रामपंचायत सदस्य नाना उंबरकर, पुजा डोखे, योगेश डोखे, मंच्छिद्र खेमनर, संजय मैड, मारूती सारबंदे, रामराव चौधरी, सुभाष वाघमारे, दत्तात्रय वाघमारे,गोकुळ सारबंदे, देशमुख आदि उपस्थित होते.
या प्रमुख मान्यवरांना झाले पुरस्कार जाहीर..!
क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली यामध्ये रामभाऊ भुसाळ, भाऊसाहेब खेमनर, सरूनाथ उंबरकर,अशिष शेळके यांना ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाला.तर उद्योगरत्न विलास उंबरकर, कलारत्न मार्कस शेळके तसेच कृषीरत्न पुरस्कार हा शौलाजा नावदंर यांना जाहीर झाला आहे.
