
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि.२६ रोजी सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,संकेत साळवे व रवि आल्हाट, रा.घोडेगाव, ता.नेवासा यांचे घरासमोर इर्शाद कुरेशी, शन्या कुरेशी, बाबु पठाण, रा.चांदा, ता.नेवासा व रवि आल्हाट अशांनी मिळून गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरीता निर्दयीपणे विना चारा पाण्याचे अनेक दिवसांपासून डांबुन ठेवले आहेत.
तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष झापवाडी रोड, घोडेगाव, ता.नेवासा येथे जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी त्यांचे घरासमोर मोकळया जागेमध्ये गोवंशीय जातीचे जनावरे निर्दयतेने डांबुन ठेवल्याचे दिसल्याने तेथील इसमांना ताब्यात घेत असताना रवी आल्हाट हा पळून गेला.सदरची जनावरे ही कत्तल करण्याकरीता डांबुन ठेवलेले असल्याची माहिती मिळाली.पथकाने पंचासमक्ष घटनाठिकाणावरून १६,००,०००/- रू किं.त्यात ४० गोवंशीय जातीची लहान मोठे जनावरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपीस जप्त मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांनी नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.वरील आरोपीविरूध्द पोकॉ. जालींदर मुरलीधर माने स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन गुरनं १५६/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम ५(अ), ५ (ब), ९ सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचे कलम ३, ११प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर, सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार घोडेगाव येथे सुरू होता परंतु प्रशासनाचे आरोपीस असलेले पाठबळ व आरोपींची सर्वसामान्य नागरिकांत असलेली दहशत यामुळे कुणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हते फरार आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिक व हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे.
16 लक्ष रुपयांची 40 देशी गोवंश जातीचे जनावरे कित्येक दिवसापासून अमानुषपणे तस्करीसाठी भर रस्त्यावर डांबून ठेवली होती.याबद्दल नागरिकात व गोसेवकात तीव्र संताप व्यक्त होत आहे
