
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर – शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे आकारावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय पटलावरून अनेकविध प्रतिक्रिया आल्या. विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.पण, सुजय विखे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे.डॉ.सुजय विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी आणि साईभक्तांनी त्यांच्यावर आगपाखड केली. त्यावर सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, साईभक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. साईभक्त आदरणीयच आहेत. पण पोलिसांकडे नोंद असलेले किती गुन्हेगार भिकाऱ्यांचं सोंग घेऊन तिथे आले आहेत ही आकडेवारी मी जाहीर करणार आहे. कधीही संस्थानकडे प्रश्न घेऊन गेलो की ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे प्रसादातून १० रुपये घेतल्याने जी काही बचत होईल त्याचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेवर मी ठाम राहणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
‘त्या’ विधानाचा विपर्यास झाला.- ना.राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डीत येणाऱ्या भक्तांना मोफत प्रसाद मिळाला पाहिजे त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे ‘साई भक्तांच्या देणगीतून महाप्रसादाचे जे काम सुरु केले आहे ते निरंतर राहील डॉ.सुजय विखे यांच्या विधानाचा विपर्यास झाला त्यांचा तसा हेतू नव्हता आम्ही डॉ.सुजयशी ह्या विषयावर बोललो डॉ.सुजय यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. त्यांचा हेतू कुणाच्या भावना दखाविण्याचा नव्हता.भीक्षेकऱ्यांनमुळे शिर्डीत काय परस्थिती वेळेवेळी निर्माण झाली, हे शिर्डीकरांना चांगलेच ठाऊक आहे,माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यावर जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
